शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पाणीच पाणी

By admin | Updated: October 8, 2016 21:00 IST

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोयाबीन अगोदरच अंकुरले असताना काढणीतही पावसाची बाधा कायम आहे

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 8 - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोयाबीन अगोदरच अंकुरले असताना काढणीतही पावसाची बाधा कायम आहे. ५0 टक्क्यांवर सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत अखंडित सुरू होता. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. सवडजवळ पुलावरून पाणी वाहात असल्याने हिंगोली-सेनगाव वाहतूक ठप्प झाली होती. तर बांगरनगरमध्ये पाणी घुसले आहे.  
जणू ढगफुटीप्रमाणे बरसलेल्या पावसाने हिंगोली शहर जलमय झाले होते. सखल भागात सगळीकडे पाणी साचले. बांगरनगर, जीनमातानगर भागात पाणी घुसले होते. कंबरेएवढ्या पाण्यात वाहनांचे टपच दिसत होते. तर एक-दोन वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. अंबिका टॉकीज, सिद्धार्थनगर, मंगळवारा-मालवाडी भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागातही पावसाने दाणादाण उडाली. नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते.
जिल्ह्यात मागच्या वादळी पावसात सोयाबीनसह झेंडू फूलशेतीचे मोठे नुकसान झाले होते. झेंडू उत्पादकांच्या तर तोंडचा घास हिरावला गेला. दसºयाला या फुलांच्या विक्रीतून परतावा मिळण्याची असलेली संधी हुकली. उडदाचेही ढीग भिजलेले असल्याने अनेक ठिकाणी हा उडीद पांढराफटक पडला. तर काही ठिकाणी तो जास्त काळ पावसात राहिल्याने त्याचा वास सुटला होता. सोयाबीनही अंकुरले होते. मात्र आता दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने शेतकरी सोयाबीन काढण्यात दंग होते. दुपारनंतर पुन्हा जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा हे काम ठप्प झाले. 
शेतकºयांच्या पिकाची पसरण शेतात तशीच आहे. पावसाने भिजलेली ही पसरण आता वाळल्याशिवाय ढीग करण्यास उचलणे शक्य नाही. तर दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने यंदा काही शेतकºयांच्या हाती सोयाबीन लागणारच नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा, मोप, भिंगी, कुरुंदा आदी भागात पावसाने चांगलेच झोडपले.
तीन तास मुसळधार
हिंगोलीत सायंकाळी चार ते सातच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीचे जसे नुकसान झाले. तशीच गत ऐतिहासिक दसरा महोत्सवातील प्रदर्शनीची झाली. ऐन सुटीच्या दिवशी झालेल्या पावसामुळे व्यवसाय ठप्प झाला. प्रदर्शनीत रोज २५ ते ४0 हजारांच्या आसपास नागरिक भेट देत असतात.