शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

हिंगोलीत पाणीच पाणी

By admin | Updated: October 8, 2016 21:00 IST

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोयाबीन अगोदरच अंकुरले असताना काढणीतही पावसाची बाधा कायम आहे

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 8 - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोयाबीन अगोदरच अंकुरले असताना काढणीतही पावसाची बाधा कायम आहे. ५0 टक्क्यांवर सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत अखंडित सुरू होता. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. सवडजवळ पुलावरून पाणी वाहात असल्याने हिंगोली-सेनगाव वाहतूक ठप्प झाली होती. तर बांगरनगरमध्ये पाणी घुसले आहे.  
जणू ढगफुटीप्रमाणे बरसलेल्या पावसाने हिंगोली शहर जलमय झाले होते. सखल भागात सगळीकडे पाणी साचले. बांगरनगर, जीनमातानगर भागात पाणी घुसले होते. कंबरेएवढ्या पाण्यात वाहनांचे टपच दिसत होते. तर एक-दोन वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. अंबिका टॉकीज, सिद्धार्थनगर, मंगळवारा-मालवाडी भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागातही पावसाने दाणादाण उडाली. नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते.
जिल्ह्यात मागच्या वादळी पावसात सोयाबीनसह झेंडू फूलशेतीचे मोठे नुकसान झाले होते. झेंडू उत्पादकांच्या तर तोंडचा घास हिरावला गेला. दसºयाला या फुलांच्या विक्रीतून परतावा मिळण्याची असलेली संधी हुकली. उडदाचेही ढीग भिजलेले असल्याने अनेक ठिकाणी हा उडीद पांढराफटक पडला. तर काही ठिकाणी तो जास्त काळ पावसात राहिल्याने त्याचा वास सुटला होता. सोयाबीनही अंकुरले होते. मात्र आता दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने शेतकरी सोयाबीन काढण्यात दंग होते. दुपारनंतर पुन्हा जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा हे काम ठप्प झाले. 
शेतकºयांच्या पिकाची पसरण शेतात तशीच आहे. पावसाने भिजलेली ही पसरण आता वाळल्याशिवाय ढीग करण्यास उचलणे शक्य नाही. तर दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने यंदा काही शेतकºयांच्या हाती सोयाबीन लागणारच नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा, मोप, भिंगी, कुरुंदा आदी भागात पावसाने चांगलेच झोडपले.
तीन तास मुसळधार
हिंगोलीत सायंकाळी चार ते सातच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीचे जसे नुकसान झाले. तशीच गत ऐतिहासिक दसरा महोत्सवातील प्रदर्शनीची झाली. ऐन सुटीच्या दिवशी झालेल्या पावसामुळे व्यवसाय ठप्प झाला. प्रदर्शनीत रोज २५ ते ४0 हजारांच्या आसपास नागरिक भेट देत असतात.