शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पुणे जिल्ह्यात सौर ऊर्जेवर येणार शिवारात पाणी ; जिल्ह्यात २९५ पंप कार्यान्वित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 23:00 IST

वीज बिल होणार बंद

ठळक मुद्देसौर कृषिपंपासाठी ९५ टक्के अनुदानसौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्षे, तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधीवीजचोरी, तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अडचणी

पुणे : शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये सौर ऊर्जेद्वारे पाणी खळाळणार असून, त्यासाठी त्यांना आता एकही पैसा वीजबिलापोटी द्यावा लागणार नाही. जिल्ह्यातील २९५ कृषिपंप कार्यान्वित झाले असल्याची माहिती ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी दिली.   महावितरणच्या मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागामधील मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील ८०६ शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ७५४ शेतकऱ्यांना योजनेचे कोटेशन दिले होते. त्यातील ४८४ शेतकऱ्यांनी आपल्या वाट्याची रक्कम भरली. त्यानुसार महावितरणकडून संबंधित एजन्सीला काम करण्याचे कंत्राट दिले. आतापर्यंत तीन एचपी क्षमतेचे २४३ आणि पाच एचपी क्षमतेचे ५२ असे २९५ सौर कृषिपंप चालू केले आहेत. तर, सद्य:स्थितीत ५५ सौर पंप कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे.कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्ही अथवा १०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारण्यात येते. त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. वीजचोरी, तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अडचणी येतात. दुर्गम व डोंगराळ भागात वीज यंत्रणेचे जाळे नसल्याने या ठिकाणी डिझेलचा वापर करून कृषिपंप चालवले जातात. या अडचणीतून मुक्तता मिळावी यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा कृषी पंप योजना हाती घेतली आहे. कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही अथवा वीजजोडणी प्रस्ताव प्रलंबित असलेल्या शेतकºयांना या योजनेत सहभागी होता येते. सोलर पॅनेल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे व इतर आवश्यक साहित्यासाठी ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जाते.--सौर कृषिपंपासाठी ९५ टक्के अनुदानसौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्षे, तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. या यंत्रणेला बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. तीन किंवा पाच एचपी क्षमतेच्या सौर प्रकल्पाची किंमत २.२५ ते २.५० लाख असून, खुल्या वर्गातील शेतकऱ्यांसाठी ९० टक्के आणि इतर प्रवर्गांसाठी ९५ टक्के अनुदान दिले जाते. या वर्षी २५ हजार सौर कृषिपंप वितरीत केले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी