शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 17:37 IST

देवेंद्र एकटे मुख्यमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. एकटा माणूस सगळ्या विरोधकांना पुरून उरायचा. आता तर आम्ही दोघे आहोत असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.

मुंबई - अजित पवारांनी सकाळी घाई केली. सबुरीने घेतले असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. जयंतराव, मला बोलले, चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. त्यावेळी मला आमच्या प्रमुखांचा फोन आला तेव्हा मी जयंत पाटील फोन उचलत नाहीत असं सांगितले. मी बोललो जयंत पाटील तिथेच आहे असा किस्सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितला. 

नेमकं काय घडलं?अजित पवारांच्या विधानांवर मुख्यमंत्री सभागृहात उत्तर देत होते. त्यावेळी ते म्हणाले की, अजितदादा तुम्ही घाई केली. तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला. अरे टीव्ही बघितली का? तर मी पाहिलं तेव्हा दादा शपथ घेत होते. मला वाटलं मागचे कधीचं दाखवतायेत. तर नाही हे आत्ताचं आहे असं मला सांगितले. मला विचारलं, अरे काय चाललंय. जयंतरावांना मी फोन करतोय ते फोन उचलत नाही. तेव्हा अनिल पाटील पाठमोरे उभे होते. मला वाटलं जयंत पाटील तिथेच आहे. पण ते जयंत पाटील नव्हते. जयंत पाटील पण गेलेत असं मी सांगितले. तुम्ही गेला असता तर कार्यक्रम ओक्केच झाला असता असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी राष्ट्रवादीला लगावला. 

त्याचसोबत जयंतरावांकडे सभागृहात बोलण्याचे मुद्दे नव्हते. त्यामुळे त्यांनी राजकीय भाषण केले. आम्ही सगळ्यांकडे लक्ष देतोय. अजित पवारांना मी काही गोष्ट सांगत होतं. त्यांनी लक्ष दिलं असतं तर बरे झाले असते. ५० आमदारांकडे आम्ही लक्ष देतोय. तुमच्याही लोकांवर माझं लक्ष आहे. त्यांनाही मदत केली जाईल. काळजी करू नका असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

मुख्य बसले होते घरी, तुम्ही चालवत होता बोट सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना उत्तर देताना काही कविता, शेरोशायरीही सादर केली. महाविकास आघाडीची बांधली होती मोट, मुख्य बसले होते घरी, तुम्ही चालवत होता बोट, श्रद्धा सबुरीचा सल्ला अजितदादांनी दिला. मी जे काही केले उघडपणे केले. आम्ही श्रद्धा सबुरीनेच वागतोय. नेहमी तुमचं बोलणं, वागणे, वेळापत्रक यावर बोलत असतो. सकाळी सकाळी दादांचं कामकाज सुरु होतं. एकदा मला त्यांनी सकाळी ८ वाजता बोलावलं. पण कसं येणार आम्ही झोपतोच ४ वाजता. त्यामुळे तुमच्याबद्दल मला आदर आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचं कौतुक केले. 

आता एक से भले दोसत्तेचा ताम्रपट कुणी घेऊन आलं नाही. २५ वर्ष आम्ही सत्तेत राहणार बोलले. २५ वर्ष कुणी पाहिली. कोण आत आहे कोण बाहेर आहे. आम्ही पुढची अडीच वर्ष इतके चांगले काम करणार की त्यापुढील ५ वर्ष इथेच राहणार. आम्ही १०-१५ वर्ष आम्ही बोलणार नाही. मी पुन्हा येईन असं फडणवीस म्हणाले. ते पुन्हा आले पण मलापण सोबत घेऊन आले. आता आम्ही दोघं आहोत. देवेंद्र एकटे मुख्यमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. एकटा माणूस सगळ्या विरोधकांना पुरून उरायचा. आता तर आम्ही दोघे. एक से भले दो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिमटा काढला.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार