शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

वातावरण तापतेय; विदर्भाला गारपिटीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 01:48 IST

थंडीने गारठलेली मुंबई आणि राज्य आता तापू लागले आहे. मुंबईसह राज्यातील शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.

मुंबई : थंडीने गारठलेली मुंबई आणि राज्य आता तापू लागले आहे. मुंबईसह राज्यातील शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, समुद्राहून वाहणारे वारे स्थिर होण्यास वेळ लागत असल्याने वातावरण तापत आहे. मुंबईतील वातावरण तापू लागले आहे. मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दरम्यान, १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, १५ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६.३, १९.६ अंश नोंदविण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते आणि त्यापूर्वीही हे तापमान २४, १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. मात्र, आता वातावरणातील बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे....त्यामुळे वारे होतात तप्तसमुद्राहून जमिनीकडे म्हणजे मुंबईकडे वाहणारे वारे सकाळी ११ वाजेपर्यंत स्थिर झाले, तर मुंबईचे वातावरण तापत नाही. म्हणजेच कमाल तापमान अधिक नोंदविण्यात येत नाही. मात्र, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब झाला म्हणजे दुपार झाली, तर हे वारे तप्त होतात. परिणामी, मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येते.दोन दिवस ‘ताप’दायकगुरुवारसह शुक्रवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. आकाश मुख्यत: निरभ्र राहील.राज्यातील शहरांचे किमान तापमानअलिबाग २०.६रत्नागिरी २१.४पणजी २२.८डहाणू २१.९पुणे १६.७जळगाव १७.४कोल्हापूर १९.३महाबळेश्वर १६.६मालेगाव २०.४नाशिक १६.४सातारा १७.४सोलापूर २०.१उस्मानाबाद १९औरंगाबाद १८.४परभणी १९.५बीड २१अकोला १९.२अमरावती १७बुलडाणा २१.६चंद्रपूर १५.४गोंदिया १४.३नागपूर १२वाशीम १९वर्धा १६.४यवतमाळ १८.४मुंबईतील ठिकठिकाणचे कमाल तापमानकुलाबा ३४.२वरळी ३२.९माझगाव ३२.६दादर ३१.७वांद्रे ३२.१सांताक्रुझ ३२.७अंधेरी ३३.७गोरगाव ३६.१मालाड ३३.९कांदिवली ३२.८चारकोप ३४.७आर्कुली ३५.१बोरीवली ३६विद्याविहार ३४घाटकोपर ३६.२पवई ३२.६जोगेश्वरी ३५.१भांडुप ३३.१मुलुंड ३३.३नेरुळ ३३.२पनवेल ३३.२(बुधवारचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

टॅग्स :weatherहवामान