शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण तापतेय; विदर्भाला गारपिटीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 01:48 IST

थंडीने गारठलेली मुंबई आणि राज्य आता तापू लागले आहे. मुंबईसह राज्यातील शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.

मुंबई : थंडीने गारठलेली मुंबई आणि राज्य आता तापू लागले आहे. मुंबईसह राज्यातील शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, समुद्राहून वाहणारे वारे स्थिर होण्यास वेळ लागत असल्याने वातावरण तापत आहे. मुंबईतील वातावरण तापू लागले आहे. मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दरम्यान, १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, १५ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६.३, १९.६ अंश नोंदविण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते आणि त्यापूर्वीही हे तापमान २४, १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. मात्र, आता वातावरणातील बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे....त्यामुळे वारे होतात तप्तसमुद्राहून जमिनीकडे म्हणजे मुंबईकडे वाहणारे वारे सकाळी ११ वाजेपर्यंत स्थिर झाले, तर मुंबईचे वातावरण तापत नाही. म्हणजेच कमाल तापमान अधिक नोंदविण्यात येत नाही. मात्र, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब झाला म्हणजे दुपार झाली, तर हे वारे तप्त होतात. परिणामी, मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येते.दोन दिवस ‘ताप’दायकगुरुवारसह शुक्रवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. आकाश मुख्यत: निरभ्र राहील.राज्यातील शहरांचे किमान तापमानअलिबाग २०.६रत्नागिरी २१.४पणजी २२.८डहाणू २१.९पुणे १६.७जळगाव १७.४कोल्हापूर १९.३महाबळेश्वर १६.६मालेगाव २०.४नाशिक १६.४सातारा १७.४सोलापूर २०.१उस्मानाबाद १९औरंगाबाद १८.४परभणी १९.५बीड २१अकोला १९.२अमरावती १७बुलडाणा २१.६चंद्रपूर १५.४गोंदिया १४.३नागपूर १२वाशीम १९वर्धा १६.४यवतमाळ १८.४मुंबईतील ठिकठिकाणचे कमाल तापमानकुलाबा ३४.२वरळी ३२.९माझगाव ३२.६दादर ३१.७वांद्रे ३२.१सांताक्रुझ ३२.७अंधेरी ३३.७गोरगाव ३६.१मालाड ३३.९कांदिवली ३२.८चारकोप ३४.७आर्कुली ३५.१बोरीवली ३६विद्याविहार ३४घाटकोपर ३६.२पवई ३२.६जोगेश्वरी ३५.१भांडुप ३३.१मुलुंड ३३.३नेरुळ ३३.२पनवेल ३३.२(बुधवारचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

टॅग्स :weatherहवामान