शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या रावणाचे दहन करून नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 05:53 IST

मुंबई : महायुतीसमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही; मात्र सर्वांत मोठे आव्हान हे समस्यांचे आहे. सत्तेत आल्यावर समस्यांच्या १० तोंडी ...

मुंबई : महायुतीसमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही; मात्र सर्वांत मोठे आव्हान हे समस्यांचे आहे. सत्तेत आल्यावर समस्यांच्या १० तोंडी रावणाचे दहन करून मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले. भांडुप येथे शिवसेना उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, वरळीतून मी उभा असलो तरी ही निवडणूक मी स्वत:साठी नाही, तर नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढवत आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाराष्ट्रातले २०० मतदारसंघ फिरलो. जिथून माझा ताफा जायचा तिथे विविध निवेदने लोक मला देत. त्या निवेदनांमध्ये लोक विविध समस्या घेऊन येत होते. अनेक निवेदनांमधून टीकादेखील होत असे. माझ्याकडून लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत म्हणून लोक मला निवेदने देत होते. या दौऱ्यादरम्यान मला काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद कुठेच दिसली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना व भाजप यांनी एकत्र वचननामा काढला असता तर तो मोठा ग्रंथ झाला असता म्हणूनच दोघांनी वेगळे वचननामे काढले. मागची पाच वर्षे ही काँग्रेस, राष्ट्रवादीची पापे पुसण्यात गेली. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून महाराष्ट्र बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त व भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे, त्यासाठीच महायुतीचे सगळे आमदार निवडून येणे गरजेचे आहे. महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता असल्यावर काम करणे सोपे होते, असे ते म्हणाले.

बेस्टच्या भाडेकपातीमुळे १० लाख प्रवासी वाढले. यामुळे पुढील ३ वर्षांत ३ हजार बस वाढवणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईत प्रतिदिन १० हजार मेट्रिक टन कचरा उचलला जायचा; परंतु सुका कचरा व ओला कचरा यांच्या वर्गीकरणास मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आज प्रतिदिन कचºयाचे प्रमाण साडेसहा हजार मेट्रिक टन एवढे कमी झाले आहे. मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांत एकूण १७,४५६ खाटा आहेत. मुंबईसारखी आरोग्य सेवा देशात कुठेच उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये व्हर्चुअल क्लासरूमबनवून सगळीकडे शिक्षणाचा दर्जा समान करायचा आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट निर्माण करून १० रुपयांत थाळी या योजनेंतर्गत त्या महिलांच्या हाती काम देणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले. बर्गरच्यादुकानात आॅफर असल्यावर महागडा बर्गर २० रुपयांना विकला जातो; मग आम्ही गरजू लोकांना १० रुपयांत थाळी दिल्यावर विरोधकांच्या पोटात का दुखते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी अयोध्येत राम मंदिर होणारच, अशी घोषणाही आदित्य यांनी केली.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेworli-acवरळीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019