शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

लोकसभेच्या 'या' ४ जागा लढवणारच, त्यासोबत...; जागावाटपावर अजित पवारांनी मौन सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:34 IST

जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून एनडीएच्या विचारांचे निवडून आणण्यासाठी माझ्यासह सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे असं अजित पवार म्हणाले.

कर्जत - आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मीडिया आणि पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झालीय. परंतु ५ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा चर्चा होईल. आपण आपल्याकडे असणाऱ्या ४ जागा लढवणारच आहोत त्यासोबत अन्य जागांवरही निवडणूक लढवू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला. 

कर्जत येथील चिंतन शिबिरात अजित पवार म्हणाले की, लोकसभेत निवडणूक झाल्यानंतर एनडीएचे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी आपल्याला काम करायचे आहे. जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून एनडीएच्या विचारांचे निवडून आणण्यासाठी माझ्यासह सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. आता आपल्याला बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लढवणारच आहोत. पण त्यासोबतच इतर काही जागा ज्या उबाठा गटाकडं आहे जिथे राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. तिथे एकनाथ शिंदे आणि भाजपासोबत चर्चा करून काही जागा लढवायच्या आहेत. पेपर आणि मीडियाला बातम्या येतील लगेच त्यावर विश्वास ठेऊ नका. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झालीय. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झालीय.५ राज्यांच्या निकालानंतर पुन्हा बैठक होईल. मतदारसंघातील ताकद पाहून एनडीएच्या सर्व घटकांना सोबत घेत चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीचं काम करायचे आहे. आपल्याला वेगवेगळी बरीच कामे आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच २ दिवसांपासून पक्षाचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन होतंय. राज्यातील ३६ जिल्ह्यातील सहकारी, वडिलधाऱ्यांनी, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी जो भाग घेतला त्याबद्दल मी मनापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीचं हे शिबीर ४००-५०० लोकांपुरते मर्यादित असल्याने अनेकांना इच्छा असूनही येता आले नाही. कार्यकर्ते असले की संघटना मजबूत होते. तो संघटनेचा कणा आहे. आज जरी मर्यादित सहकाऱ्यांच्या उपस्थितीत  शिबीर घेतले असले तरी आपल्याकडे वेळ कमी आहे. माझ्या अंदाजानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल असं अजित पवारांनी म्हटलं. 

दरम्यान,छत्रपतींच्या रयतेच्या राज्याची प्रेरणा घेऊन शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना राष्ट्रवादीने आदर्श मानलेले आहे. काहीजण म्हणतात, या कारणासाठी गेले. केसेस होत्या त्या थांबाव्यात म्हणून गेले असा आरोप करतात. १९९९ पासून मी, तटकरे यांनी मंत्रिमंडळात काम केलेत, आमच्यावर आरोप झाले, पण आरोप सिद्ध व्हायला हवेत, वस्तूस्थिती असावी. माझ्यावरील आरोपांमुळे जलसंपदा विभागातील कामांची गती थांबली. माधवराव चितळेंनी जे श्वेतपत्रिका काढली त्याचा अहवाल आहे. आरोप झाले होते, मी आज ३२ वर्ष काही अपवाद वगळता मंत्रिपदावर काम करतोय. २०१२ ला राज्यात भारनियमनातून महाराष्ट्राला मुक्त केले. आम्ही दिलेला शब्द पाळतो, जे बोलतो तसे वागतो. आज जवळपास ६ लाख कोटींचे बजेट अर्थ आणि नियोजन विभागाकडे जबाबदारी असते. माझ्याकडे जीएसटीची जबाबदारी आहे, तब्बल २ लाख कोटी कर गोळा होतो. पण पारदर्शक काम आहे. कार्यकर्त्यांचे काम व्हावं यापेक्षा त्याला काय हवं असते? असं अजित पवारांनी सांगितले. 

...मग जिल्हाध्यक्षांना प्राधान्य देणार

यापुढे माझ्या कार्यालयात विकासकामांसाठी येणार असाल तर पहिले प्राधान्य मंत्र्यांना, त्यानंतर आमदार, खासदारांना आणि तिसरे प्राधान्य पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना असेल. आपण पक्षातील पदावरील लोकांना मानसन्मान दिला पाहिजे. माझ्यासह हे सर्व मंत्र्यांना लागू आहे असं अजित पवारांनी सूचित केले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी