शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पदोन्नती नाकारल्यास तीन वर्षे वाट पाहा

By admin | Updated: September 13, 2016 06:09 IST

पदोन्नती नाकारण्याच्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांमधील वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठीचे नवे धोरण आज राज्य सरकारने जाहीर केले.

यदु जोशी, मुंबई पदोन्नती नाकारण्याच्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांमधील वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठीचे नवे धोरण आज राज्य सरकारने जाहीर केले. त्यानुसार, पदोन्नती नाकारणाऱ्यांना पदोन्नतीसाठी वाट पाहावी लागणार आहे. पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार देणाऱ्याचे नाव पदोन्नतीसाठी पात्र अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या निवड यादीतून काढण्यात येईल. तसेच, पुढील दोन वर्षे निवडसूचीमध्ये त्यांच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षीच्या निवडसूचीत त्यांची पदोन्नतीसाठीची पात्रता तपासण्यात येणार आहे. त्या वेळच्या गुणवत्तेप्रमाणे संबंधित अधिकारी/कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरल्यास त्यांचा नियमित निवडसूचीत समावेश करण्यात येणार आहे. उदा. २०१५ च्या निवडसूचीसाठी (१.९.२०१४ ते ३१.८.२०१५) १५.१.२०१५ रोजी झालेल्या निवडसूचीत एखाद्या अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला असेल व त्यांनी पदोन्नतीस नकार दिल्यास त्यांचे नाव २०१५ च्या निवडसूचीतून वगळून त्यांचा २०१६ व २०१७ च्या निवडसूचीकरता देखील विचार न करता २०१८ च्या निवडसूचीसाठी विचार करण्यात येणार आहे.

पदोन्नती नाकारल्याच्या तीन वर्षांनंतर दुसऱ्या वेळच्या निवडसूचीकरता विचार करण्यात येईल. त्यानंतर पदोन्नतीस पात्र ठरल्यास मात्र, संबंधिताने पुन्हा पदोन्नतीस नकार दिला तर त्याचा पुढील दोन वर्षे निवडसूचीत विचार करण्यात येणार नाही. पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार दिलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची वरच्या पदावरील सेवाज्येष्ठता ही ज्यावेळी संबंधित अधिकारी/कर्मचारी पुढील निवडसूचीत (तीन वर्षांनंतरच्या) पदोन्नतीस पात्र ठरेल व प्रत्यक्ष पदोन्नतीच्या पदावर रुजू होईल त्या दिनांकापासून विचारात घेतली जाईल.

पदोन्नती नाकारलेल्यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ दिले असल्यास ते काढून घेण्यासंदर्भात वित्त विभागाच्या आदेशांनुसार कार्यवाही करण्यात येईल. पदोन्नती नाकारलेल्यांमुळे रिक्त झालेल्या किंवा रिक्त होणाऱ्या पदावर संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याच्या प्रवर्गानुसार व ज्येष्ठतेनुसार पात्र कनिष्ठ अधिकारी/कर्मचाऱ्याचा समावेश निवडसूचीत करण्यात येणार आहे. ज्या अधिकारी/कर्मचाऱ्याने कायमस्वरुपी पदोन्नती नाकारली आहे त्याचा पुढील कोणत्याही काळासाठी निवडसूचीकरता विचार करण्यात येणार नाही.

पदोन्नती नाकारण्यासंदर्भातील अर्ज हा विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकापूर्वी प्राप्त झाल्यास किंवा पदोन्नतीचे आदेश निर्गमित केल्यानंतर देखील प्राप्त झाल्यास ते विचारात घेऊन संबंधितांचे नाव निवडसूचीतून वगळण्यात येईल.पदोन्नती नाकारण्यामागे विभागीय संवर्गपदोन्नतीच्या यादीत क्रमानुसार नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक अशीच पसंती असते. विदर्भ, मराठवाड्यातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने ही अट टाकली. त्यामुळे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा पदोन्नती नाकारण्याकडे अधिक कल असतो. तसेच, विदर्भातील अधिकाऱ्यांना अन्य विभागात जावे लागते. विभागीय संवर्गाची अट रद्द करावी व त्याची सुरुवात महिला अधिकाऱ्यांपासून करावी, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी केली.