शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

प. महाराष्ट्र ओव्हरफ्लो, विदर्भ कोरडा; मोठे प्रकल्प ३ टक्केच भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:39 IST

मध्यम प्रकल्पात ४ टक्केच पाणी

- रूपेश उत्तरवार यवतमाळ : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक भागात धुवांधार पाऊस बरसत आहे. या ठिकाणच्या धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणाचे दरवाजे उघडले आहे.तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. याचवेळी मध्य विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस होत आहे. यामुळे या भागातील धरणे भरलेली नाही. राज्यातील ३२६७ धरणांतील या विसंगतीने शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.सर्वाधिक वाईट स्थिती मराठवाडा आणि मध्य विदर्भातील प्रकल्पांची आहे. अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांत दोन महिन्यांनंतर १२.६२ टक्केच जलसाठा झाला. औरंगाबाद विभागातील ४५ प्रकल्पांत ३.०८ टक्के पाणी आहे. नागपूर विभागातील १६ प्रकल्पांत २२ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्पाची अवस्थाही अशीच आहे. अमरावती विभागातील २५ मध्यम प्रकल्पांत ३२ टक्के, तर औरंगाबाद विभागातील ८१ प्रकल्पांत ४.५८ टक्के पाणी संचय झाला आहे. अमरावती विभागातील ४११ लघु प्रकल्पांत ६.५२ टक्के जलसाठा आहे. औरंगाबाद विभागातील ८६८ प्रकल्पात १.६१ टक्केच पाणी आहे. जलसाठ्याच्या या स्थितीमुळे भविष्यात रबीची लागवड करता येणार किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.३० लाख हेक्टरवरील उत्पन्न घटणारपावसाच्या असमानतेने पेरणी बाकी असलेल्या ३० लाख हेक्टरवरील क्षेत्रात शेतकऱ्यांनी ऐनवेळी नियोजन बदलले आहे. अल्पावधीत हातात येणारे पीक लावायचे किंवा रबीतच लागवड करायची, याबाबत शेतकरी विचार करत आहेत. यामुळे या क्षेत्रातील उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका आहे. यात पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना फटका बसणार आहे.मुठा नदी वाहिली दुथडीपुणे : शंभर टक्के भरलेल्या खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने पानशेत धरणातून जवळपास तेरा हजार क्युसेकने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले. परिणामी शनिवारी सकाळी अकरा वाजता खडकवासला धरणात यंदाच्या हंगामातील सर्वोच्च २७,२०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्राच्या दोनही बाजूचे रस्ते पाण्याखाली गेले होते.उजनीत १९ टीएमसी पाणीसाठाजिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने उजनी धरणात शनिवारी सायंकाळी पाच पर्यंत १९.४२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला. शनिवारी सायंकाळ नंतरही विसर्ग सुरु असल्याने, रविवारी पाणीसाठ्यात मोठी वाढ होईल.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ