शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प. महाराष्ट्र ओव्हरफ्लो, विदर्भ कोरडा; मोठे प्रकल्प ३ टक्केच भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:39 IST

मध्यम प्रकल्पात ४ टक्केच पाणी

- रूपेश उत्तरवार यवतमाळ : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक भागात धुवांधार पाऊस बरसत आहे. या ठिकाणच्या धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणाचे दरवाजे उघडले आहे.तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. याचवेळी मध्य विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस होत आहे. यामुळे या भागातील धरणे भरलेली नाही. राज्यातील ३२६७ धरणांतील या विसंगतीने शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.सर्वाधिक वाईट स्थिती मराठवाडा आणि मध्य विदर्भातील प्रकल्पांची आहे. अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांत दोन महिन्यांनंतर १२.६२ टक्केच जलसाठा झाला. औरंगाबाद विभागातील ४५ प्रकल्पांत ३.०८ टक्के पाणी आहे. नागपूर विभागातील १६ प्रकल्पांत २२ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्पाची अवस्थाही अशीच आहे. अमरावती विभागातील २५ मध्यम प्रकल्पांत ३२ टक्के, तर औरंगाबाद विभागातील ८१ प्रकल्पांत ४.५८ टक्के पाणी संचय झाला आहे. अमरावती विभागातील ४११ लघु प्रकल्पांत ६.५२ टक्के जलसाठा आहे. औरंगाबाद विभागातील ८६८ प्रकल्पात १.६१ टक्केच पाणी आहे. जलसाठ्याच्या या स्थितीमुळे भविष्यात रबीची लागवड करता येणार किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.३० लाख हेक्टरवरील उत्पन्न घटणारपावसाच्या असमानतेने पेरणी बाकी असलेल्या ३० लाख हेक्टरवरील क्षेत्रात शेतकऱ्यांनी ऐनवेळी नियोजन बदलले आहे. अल्पावधीत हातात येणारे पीक लावायचे किंवा रबीतच लागवड करायची, याबाबत शेतकरी विचार करत आहेत. यामुळे या क्षेत्रातील उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका आहे. यात पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना फटका बसणार आहे.मुठा नदी वाहिली दुथडीपुणे : शंभर टक्के भरलेल्या खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने पानशेत धरणातून जवळपास तेरा हजार क्युसेकने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले. परिणामी शनिवारी सकाळी अकरा वाजता खडकवासला धरणात यंदाच्या हंगामातील सर्वोच्च २७,२०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्राच्या दोनही बाजूचे रस्ते पाण्याखाली गेले होते.उजनीत १९ टीएमसी पाणीसाठाजिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने उजनी धरणात शनिवारी सायंकाळी पाच पर्यंत १९.४२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला. शनिवारी सायंकाळ नंतरही विसर्ग सुरु असल्याने, रविवारी पाणीसाठ्यात मोठी वाढ होईल.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ