शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

प. महाराष्ट्र ओव्हरफ्लो, विदर्भ कोरडा; मोठे प्रकल्प ३ टक्केच भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:39 IST

मध्यम प्रकल्पात ४ टक्केच पाणी

- रूपेश उत्तरवार यवतमाळ : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक भागात धुवांधार पाऊस बरसत आहे. या ठिकाणच्या धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणाचे दरवाजे उघडले आहे.तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. याचवेळी मध्य विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस होत आहे. यामुळे या भागातील धरणे भरलेली नाही. राज्यातील ३२६७ धरणांतील या विसंगतीने शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.सर्वाधिक वाईट स्थिती मराठवाडा आणि मध्य विदर्भातील प्रकल्पांची आहे. अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांत दोन महिन्यांनंतर १२.६२ टक्केच जलसाठा झाला. औरंगाबाद विभागातील ४५ प्रकल्पांत ३.०८ टक्के पाणी आहे. नागपूर विभागातील १६ प्रकल्पांत २२ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्पाची अवस्थाही अशीच आहे. अमरावती विभागातील २५ मध्यम प्रकल्पांत ३२ टक्के, तर औरंगाबाद विभागातील ८१ प्रकल्पांत ४.५८ टक्के पाणी संचय झाला आहे. अमरावती विभागातील ४११ लघु प्रकल्पांत ६.५२ टक्के जलसाठा आहे. औरंगाबाद विभागातील ८६८ प्रकल्पात १.६१ टक्केच पाणी आहे. जलसाठ्याच्या या स्थितीमुळे भविष्यात रबीची लागवड करता येणार किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.३० लाख हेक्टरवरील उत्पन्न घटणारपावसाच्या असमानतेने पेरणी बाकी असलेल्या ३० लाख हेक्टरवरील क्षेत्रात शेतकऱ्यांनी ऐनवेळी नियोजन बदलले आहे. अल्पावधीत हातात येणारे पीक लावायचे किंवा रबीतच लागवड करायची, याबाबत शेतकरी विचार करत आहेत. यामुळे या क्षेत्रातील उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका आहे. यात पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना फटका बसणार आहे.मुठा नदी वाहिली दुथडीपुणे : शंभर टक्के भरलेल्या खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने पानशेत धरणातून जवळपास तेरा हजार क्युसेकने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले. परिणामी शनिवारी सकाळी अकरा वाजता खडकवासला धरणात यंदाच्या हंगामातील सर्वोच्च २७,२०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्राच्या दोनही बाजूचे रस्ते पाण्याखाली गेले होते.उजनीत १९ टीएमसी पाणीसाठाजिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने उजनी धरणात शनिवारी सायंकाळी पाच पर्यंत १९.४२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला. शनिवारी सायंकाळ नंतरही विसर्ग सुरु असल्याने, रविवारी पाणीसाठ्यात मोठी वाढ होईल.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ