लातूर : नवमतदारांनो, बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणारे वीर जवान, पुलवामातील शहीद, शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांना पक्की घरे मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातले पहिले मतदान करा, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत एका प्रकारे सैनिकांच्या नावानेच मते मागितली. पंतप्रधानांनी मंगळवारच्या सभेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुन्हा उल्लेख केला.
शरदराव़, तुम्ही कोणा लोकांसोबत उभे आहात? काँग्रेसकडून तर देशाला अपेक्षा नाहीत़, पण शरदराव तुम्हीसुद्धा? शरदराव तुम्हाला शोभून दिसते? असे सवाल करीत मोदी यांनी महाआघाडीवरून शरद पवारांवर उपरोधिक टोलेबाजी केली़ मोदींनी भाषणात दहशतवाद, पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा जाहीरनामा व भाजप सरकारच्या योजनांवर विवेचन केले़ पाकिस्तानचे विमान पाडले यावर किती पुरावे द्यायचे? तुमच्या वीर जवानांवर तुम्हाला विश्वास नाही? देशाचे तुकडे करणाऱ्या लोकांना परवाना देण्याचे काँग्रेसचे धोरण आहे़ त्यांनी देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा केलीच आहे़, असे मोदी म्हणाले.