शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 06:23 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७९,८५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला आणि अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क झाले आहेत. मतदानासाठी लाखो पोलिसांचा फौजफाटा राज्यभर तैनात करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कुठेही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यादृष्टीने पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावून शांततापूर्ण वातावरणात ही प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक संजय वर्मा यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७९,८५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून १५३ कोटींच्या रकमेसह दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू असा ६५५.५३ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  

पोलिस महासंचालक वर्मा म्हणाले, ज्या ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या तेथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व मतदान केंद्रांबाहेर पोलिस तैनात आहेत. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेळोवेळी सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. 

७८,२६७ जणांकडे शस्त्रे

राज्यात ७८,२६७ जणांकडे परवानाधारी शस्त्रे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यापैकी ५६,६०४ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. तर २३५ जणांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ६११ जणांचे परवाने रद्द करून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २,२०६ अवैध शस्त्रे जप्त करण्यात यंत्रणांना यश आले तर २० हजार ४९५ शस्त्रांना परवाना जमा करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliceपोलिस