शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहावीपर्यंत मराठी लवकरच सक्तीची करणार : विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 03:56 IST

राज्यातील सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले.मराठी भाषेवरून गेले २ दिवस विधिमंडळात गदारोळ सुरू आहे. काल राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न झाल्याने सदस्यांना इंग्रजी भाषण ऐकावे लागले.मंगळवारी मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवनाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेल्या ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...’ या अभिमान गीतातील शेवटचे कडवे न गायले गेल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अमराठी शाळांत मराठी सक्तीची करावी, अशी एकमुखी भावना सभागृहात व्यक्त झाली. कर्नाटकात कन्नड भाषा दहावीपर्यंत अनिवार्य आहे. मग महाराष्ट्रात मराठी अनिवार्य का नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मराठी दिनाचे औचित्य साधून दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय एकमुखाने घेऊनच टाका, असा आग्रह त्यांनी धरला.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शाळांत मराठीच्या सक्तीची भावना व्यक्त केली. त्याला भाजपा-शिवसेना सदस्यांनी पाठिंबा दिला. यावर, तावडे म्हणाले की, मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करावी की बारावीपर्यंत, याचा विचार सुरू आहे.सध्या आठवीपर्यंत मराठी अनिवार्य आहे. सभागृहाच्या भावना अभ्यास मंडळास कळवून त्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018marathiमराठीSchoolशाळाVinod Tawdeविनोद तावडे