शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

३०० गावांमध्ये ग्रामपरिवर्तनाची योजना, १५० गावांमध्ये नेमले मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:15 IST

राज्यातील खेड्यांचा शाश्वत विकास करण्यासाठी राज्य शासन आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला आतापर्यंत विविध कंपन्यांनी ३१ कोटी रुपयांची मदत दिली आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्यातील खेड्यांचा शाश्वत विकास करण्यासाठी राज्य शासन आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला आतापर्यंत विविध कंपन्यांनी ३१ कोटी रुपयांची मदत दिली आहे. ३०० गावांमध्ये ग्राम परिवर्तनाची ही अनोखी योजना सुरू झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज फाऊंडेशनची आढावा बैठक झाली.त्यावेळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, आनंद महिंद्रा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर, जलसंधारण मंत्रीप्रा. राम शिंदे, उद्योजक रॉनी स्क्रूवाला, जरीना स्क्रूवाला, अजय पिरामल, अमित चंद्रा, पार्थ जिंदाल, शिखा शर्मा, संजीव मेहता, हेमेंद्र कोठारी, निखील मेस्वानी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पोपटराव पवार आदी यावेळी उपस्थित होते.या फाऊंडेशनच्या माध्यमातून खेड्यापाड्यात पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालये,स्वच्छता, समूह शेतीचा विकास, त्यासाठीचे प्रशिक्षण, शेतमालाचे मार्केटिंग, दुर्गम भागात टेलिमेडिसिनची सुविधा, डिजिटल कनेक्टिव्हीटी, घरकूल योजना, कौशल्य विकास, जलसंचय आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सीएसआर निधी, राज्य शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्यामधून गावांचा विकास करण्याची ही योजना आहे.३०० गावांपैकी १५० गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक नेमण्यात आले आहेत. ते फाऊंडेशन आणि ग्रामस्थ, ग्राम पंचायतींशी समन्वय राखून करतील आणि गावातच राहतील. एकूण २०० कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत.आतापर्यंत फाऊंडेशनला हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा ग्रूप, रिलायन्स फाऊंडेशन, अ‍ॅक्सिस बँक फाऊंडेशन, एचटी पारेख फाऊंडेशन, जेएसडब्ल्यू फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, स्वदेस फाऊंडेशन, सायस्का एलईडी यांनी ३१ कोटी रुपयांची मदत दिली आहे.या कंपन्यांनी येत्या तीन वर्षांत एकूण ९० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. १० कोटी रुपयांचा भार राज्य शासनाने उचलला आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार गावांचा विकास केला जाणार आहे.कॉर्पोरेट क्षेत्राने या कामी दाखविलेला उत्साह आणि दिलेला सहयोग निश्चितच कौतुकास्पद आहे. या माध्यमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळून राज्यात ग्रामविकासाची चळवळ अधिक गतिमान होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीशासन, कॉपोर्रेट आणि लोकांच्या सहभागातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेली ही चळवळ निश्चितच आदर्शवत आहे.- रतन टाटा, प्रख्यात उद्योगपती

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस