शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

गावनिहाय पाण्याचा ताळेबंद ;१३ जिल्ह्यांत पथदर्शी प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:46 IST

गावातील पाण्याचे स्रोत, भूजलपातळी, गावातील पीकपद्धती, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जाणार तेराशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये राबविणार उपक्रम

ठळक मुद्देतेराशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये राबविणार उपक्रम राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के क्षेत्र बेसॉल्ट खडकाचे लोकसंख्या, लागणारे पाणी, जनावरे, चारा व शेतीसाठी पाण्याचा गावनिहाय ताळेबंद

विशाल शिर्के - पुणे : राज्य सातत्याने पाण्याचे दुष्काळाला सामोरे जात आहे. पाणी वाटपावरून राज्या-राज्यामध्येच नव्हे, तर जिल्ह्यांतर्गतदेखील वाद निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे गावातील पाण्याची गरज गावातच भागविली जावी, या उद्देशाने केंद्र सरकारने गावनिहाय पाण्याचा ताळेबंद मांडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत गावातील पाण्याचे स्रोत, भूजलपातळी, गावातील पीकपद्धती, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जाणार आहे. पथदर्शी प्रकल्पांतर्गत राज्यातील १३३९ ग्रामपंचायतीमधील तब्बल १३७२ गावांची निवड करण्यात आली असून, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.‘दगडांच्या देशा’ अशीच राज्याची भौगोलिक स्थिती आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के क्षेत्र बेसॉल्ट खडकाचे आहे. पाणी साठवणक्षमता अवघी १ ते ३ टक्के इतकी आहे. रुपांतरित कठीण खडक १० टक्के असून, याचीही पाणी धारण क्षमता १ ते ३ टक्के आहे. शास्त्रीय पद्धतीने भेगा वाढवून ही क्षमता पाच टक्क्यांपर्यंत वाढविता येते. जवळपास ८ टक्के भूभाग स्तरित खडकांनी बनला असून, त्याची पाणी धारण करण्याची क्षमता साडेपाच टक्के आहे. गाळाचा साडेचार टक्के भाग असून, याची पाणी धारण करण्याची क्षमता सर्वाधिक पाच ते दहा टक्केइतकी आहे. राज्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, गावाची लोकसंख्या, लागणारे पाणी, जनावरे, चारा व शेतीसाठी लागणाºया पाण्याचा गावनिहाय ताळेबंद मांडला जाईल. त्यानुसार जलपुनर्भरण कसे करायचे, त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे ठरविण्यात येईल. तसेच, आवश्यकतेनुसार कृषी आणि मृद विभागाच्या सहकार्याने संबंधित गावात कोणते पीक घ्यावे, याची शिफारस केली जाईल........गावात पडणारा पाऊस, भूजलाचे प्रमाण, भूजलाचा होणारा उपसा, विविध कारणांसाठी होणारा पाण्याचा वापर यावरून गावाचा पाणी ताळेबंद मांडला जाईल. या ताळेबंदानुसार जलपुनर्भरण कामे करण्याबरोबरच व पीकपद्धतीचा सल्ला दिला जाईल. प्रथमच असा ताळेबंद मांडला जाणार असून, त्यासाठी राज्यातील १३३९ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्याबाबत येत्या १२ फेब्रुवारीला दिल्लीत बैठक होणार असून, त्यात तांत्रिक निकष निश्चित होतील. - कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा..........भौगोलिक रचनेमुळे भूजलक्षमतेत फारशी वाढ करणे शक्य नसली तरी योग्य व्यवस्थापन, जलपुनर्भरण व जमिनीवरील जलस्रोतांचे व्यवस्थापन याद्वारे गावाची संपूर्ण पाण्याची गरज भागविता येईल. त्यासाठीच अटल भूजल योजनेअंतर्गत पाण्याचा ताळेबंद मांडून त्याचे नियोजन केले जाणार आहे. .......या जिल्ह्यातील गावांमध्ये राबविणार अटल भूजल योजनाजिल्हा      तालुके                               गावांची           ग्रामपंचायतीची                 संख्या                                संख्यापुणे          बारामती, पुरंदर                    १२०                         १०१सातारा    माण, खटाव, वाई                   ११४                        ११३सांगली    जत, कवठेमहांकाळ,               ८९                           ८९    खानापूर, तासगावसोलापूर    माढा, मोहोळ, पंढरपूर            ५१                          ५०नाशिक    देवळा, सिन्नर                       १३०                        १२९अहमदनगर    राहता, संगमनेर              ८६                           ८६जळगाव    अंमळनेर, पारोळा, यावल     १२१                      १२१जालना    जालना, घनसांगवी, परतुर     ५०                          ४९लातूर    चाकूर, लातूर, निलंगा, रेणापूर   १३६                     १३३उस्मानाबाद    उस्मानाबाद, उमरगा      ५५                          ५५अमरावती    चांदुर बाजार, मोर्शी, वरुड    २१७                      २१३बुलढाणा    मोताळा                                  ६८                       ६८नागपूर    काटोल, नरखेड                     १३५                         १३२एकूण                                                  १३७२                      १३३९

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीgram panchayatग्राम पंचायतFarmerशेतकरीagricultureशेतीResearchसंशोधन