शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

गावनिहाय पाण्याचा ताळेबंद ;१३ जिल्ह्यांत पथदर्शी प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:46 IST

गावातील पाण्याचे स्रोत, भूजलपातळी, गावातील पीकपद्धती, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जाणार तेराशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये राबविणार उपक्रम

ठळक मुद्देतेराशेहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये राबविणार उपक्रम राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के क्षेत्र बेसॉल्ट खडकाचे लोकसंख्या, लागणारे पाणी, जनावरे, चारा व शेतीसाठी पाण्याचा गावनिहाय ताळेबंद

विशाल शिर्के - पुणे : राज्य सातत्याने पाण्याचे दुष्काळाला सामोरे जात आहे. पाणी वाटपावरून राज्या-राज्यामध्येच नव्हे, तर जिल्ह्यांतर्गतदेखील वाद निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे गावातील पाण्याची गरज गावातच भागविली जावी, या उद्देशाने केंद्र सरकारने गावनिहाय पाण्याचा ताळेबंद मांडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत गावातील पाण्याचे स्रोत, भूजलपातळी, गावातील पीकपद्धती, पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जाणार आहे. पथदर्शी प्रकल्पांतर्गत राज्यातील १३३९ ग्रामपंचायतीमधील तब्बल १३७२ गावांची निवड करण्यात आली असून, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.‘दगडांच्या देशा’ अशीच राज्याची भौगोलिक स्थिती आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के क्षेत्र बेसॉल्ट खडकाचे आहे. पाणी साठवणक्षमता अवघी १ ते ३ टक्के इतकी आहे. रुपांतरित कठीण खडक १० टक्के असून, याचीही पाणी धारण क्षमता १ ते ३ टक्के आहे. शास्त्रीय पद्धतीने भेगा वाढवून ही क्षमता पाच टक्क्यांपर्यंत वाढविता येते. जवळपास ८ टक्के भूभाग स्तरित खडकांनी बनला असून, त्याची पाणी धारण करण्याची क्षमता साडेपाच टक्के आहे. गाळाचा साडेचार टक्के भाग असून, याची पाणी धारण करण्याची क्षमता सर्वाधिक पाच ते दहा टक्केइतकी आहे. राज्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, गावाची लोकसंख्या, लागणारे पाणी, जनावरे, चारा व शेतीसाठी लागणाºया पाण्याचा गावनिहाय ताळेबंद मांडला जाईल. त्यानुसार जलपुनर्भरण कसे करायचे, त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे ठरविण्यात येईल. तसेच, आवश्यकतेनुसार कृषी आणि मृद विभागाच्या सहकार्याने संबंधित गावात कोणते पीक घ्यावे, याची शिफारस केली जाईल........गावात पडणारा पाऊस, भूजलाचे प्रमाण, भूजलाचा होणारा उपसा, विविध कारणांसाठी होणारा पाण्याचा वापर यावरून गावाचा पाणी ताळेबंद मांडला जाईल. या ताळेबंदानुसार जलपुनर्भरण कामे करण्याबरोबरच व पीकपद्धतीचा सल्ला दिला जाईल. प्रथमच असा ताळेबंद मांडला जाणार असून, त्यासाठी राज्यातील १३३९ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. त्याबाबत येत्या १२ फेब्रुवारीला दिल्लीत बैठक होणार असून, त्यात तांत्रिक निकष निश्चित होतील. - कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा..........भौगोलिक रचनेमुळे भूजलक्षमतेत फारशी वाढ करणे शक्य नसली तरी योग्य व्यवस्थापन, जलपुनर्भरण व जमिनीवरील जलस्रोतांचे व्यवस्थापन याद्वारे गावाची संपूर्ण पाण्याची गरज भागविता येईल. त्यासाठीच अटल भूजल योजनेअंतर्गत पाण्याचा ताळेबंद मांडून त्याचे नियोजन केले जाणार आहे. .......या जिल्ह्यातील गावांमध्ये राबविणार अटल भूजल योजनाजिल्हा      तालुके                               गावांची           ग्रामपंचायतीची                 संख्या                                संख्यापुणे          बारामती, पुरंदर                    १२०                         १०१सातारा    माण, खटाव, वाई                   ११४                        ११३सांगली    जत, कवठेमहांकाळ,               ८९                           ८९    खानापूर, तासगावसोलापूर    माढा, मोहोळ, पंढरपूर            ५१                          ५०नाशिक    देवळा, सिन्नर                       १३०                        १२९अहमदनगर    राहता, संगमनेर              ८६                           ८६जळगाव    अंमळनेर, पारोळा, यावल     १२१                      १२१जालना    जालना, घनसांगवी, परतुर     ५०                          ४९लातूर    चाकूर, लातूर, निलंगा, रेणापूर   १३६                     १३३उस्मानाबाद    उस्मानाबाद, उमरगा      ५५                          ५५अमरावती    चांदुर बाजार, मोर्शी, वरुड    २१७                      २१३बुलढाणा    मोताळा                                  ६८                       ६८नागपूर    काटोल, नरखेड                     १३५                         १३२एकूण                                                  १३७२                      १३३९

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीgram panchayatग्राम पंचायतFarmerशेतकरीagricultureशेतीResearchसंशोधन