शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विखे-थोरात कलगीतुरा अन् चव्हाणांचा सल्ला; दोघे एकत्र बसल्याने नवा प्रश्न उद्भवू नये - नार्वेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:19 IST

हे दोघे एकत्र बसल्याने नवीन प्रश्न निर्माण होऊ नयेत एवढेच, अशी टिप्पणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. 

मुंबई : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या दोन नेत्यांना एकत्र बसून चर्चा करण्याचा आणि मार्गही काढण्याचा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देताच, सभागृहात हशा पिकला. हे दोघे एकत्र बसल्याने नवीन प्रश्न निर्माण होऊ नयेत एवढेच, अशी टिप्पणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. कुंडेगव्हाण (जि.रायगड) येथून मुंबईतील विकासकामांसाठी वाळू व खडीचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून होत असलेल्या गैरव्यवहाराबाबतचा मूळ प्रश्न भाजपचे प्रशांत बंब यांनी विचारला होता. हा धागा पकडून मग सर्वपक्षीय सदस्यांनी वाळू समस्येवरून प्रश्नांची सरबत्ती केली. 

धोरणात बदल करण्याची तयारी -वाळू धोरणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल, यासाठी सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांच्या सूचनांचे मी स्वागतच करेन. त्यानुसार, धोरणात बदल करण्याचीही तयारी आहे, असे विखे पाटील म्हणाले. 

- तेव्हाच ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण उभे राहिले. ‘विखे पाटील आणि बाळासाहेब हे दोघेही मातब्बर नेते आहेत; एकाच जिल्ह्यातील आहेत. - या विषयावर एकत्र बसून ते प्रश्न मार्गी लावतील का?’ असे चव्हाण यांनी म्हणताच, सभागृहातील वातावरण हलकेफुलके झाले. त्यातच हे दोघे एकत्र बसले, तर नवीन प्रश्न उद्भवू नयेत, अशी कोटी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAshok Chavanअशोक चव्हाण