शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

Vidhan Sabha 2024: मविआचे सरकार स्थगिती देणारे; देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 09:32 IST

महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

भद्रावती (चंद्रपूर) : महायुती सरकारने एससी, एसटी, आदिवासी, ओबीसी, भटका-विमुक्त समाज, दलितांसाठी विविध योजना काढल्या. त्यात शिष्यवृत्ती योजना, मोफत शिक्षण योजना, घरकुल योजना, बिरसा मुंडा योजना असे ओबीसी व भटक्या विमुक्तांसाठी एकूण ४८ निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून, गती व प्रगतिशील सरकार आहे व महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती देणारे सरकार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

येथील नीळकंठराव शिंदे पटांगणावर महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ. सुभाष धोटे, आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सोयाबीनचा सहा हजार रुपये भाव देण्याचा प्रयत्न चालू आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजारांवरून २० हजार रुपये बोनस दिला. आता २५ हजार  रुपयांचा बोनस देण्याची तरतूद चालू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस १२ तास वीज देणार आहोत. त्यात कृषिपंपासाठी लागणाऱ्या विजेचे बिल द्यावे लागणार नाही. 

गोसीखुर्दचे पाणी आरमोरीला आणणार

गडचिरोली : छत्तीसगड, तेलंगणातून महाराष्ट्रात येताना गडचिरोली हा पहिला जिल्हा लागतो. त्यामुळे महाराष्ट्राचे हे शेवटचे टोक नाही, तर प्रवेशद्वार आहे. या भागातील विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. गोसीखुर्दचे पाणी आरमोरीत आणून सिंचन सुविधा उपलब्ध केल्या जातील, उद्योगांनाही चालना दिली जाईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

आरमोरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ देसाईगंज येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सज्जन आमदारांची विधानसभेत स्पर्धा घेतली तर कृष्णा गजबे हे पहिले येतील, असे सांगून फडणवीस यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करीत कृष्णा गजबेंना आशीर्वाद द्या, विकासाची गॅरंटी मी घेतो, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

मविआकडून मतांसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन

नागपूर : महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा अल्पसंख्यांकांच्या मतांवर डोळा असून त्यासाठी लांगूलचालनाची सर्वोच्च पातळी गाठली आहे.राष्ट्रहितासाठी सर्वांना एकजूट करावी लागेल व ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना महायुती प्रत्युत्तर देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, म्हणाले.

उलेमा कौन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी हे व्होट जेहादचे आवाहन करीत आहेत. धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस व्होट जिहाद करीत आहेत. नोमानी यांनी या पक्षांकडे १७ मागण्या दिल्या होत्या. मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, २०१२ ते २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील दंगलींमधील मुस्लिम आरोपींच्या केसेस काढून घेणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणे, अशा प्रकारच्या या मागण्या आहेत. देशाच्या इतिहासात निवडणुकीत मते मिळविण्यासाठी इतके लांगूलचालनपणा आम्ही बघितले नव्हते. त्याविषयी तथाकथित सेक्युलर काहीच का बोलत नाहीत, असा सवालही फडणवीस यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी