शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Vidhan Sabha 2024: मविआचे सरकार स्थगिती देणारे; देवेंद्र फडणवीसांनी चढवला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 09:32 IST

महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

भद्रावती (चंद्रपूर) : महायुती सरकारने एससी, एसटी, आदिवासी, ओबीसी, भटका-विमुक्त समाज, दलितांसाठी विविध योजना काढल्या. त्यात शिष्यवृत्ती योजना, मोफत शिक्षण योजना, घरकुल योजना, बिरसा मुंडा योजना असे ओबीसी व भटक्या विमुक्तांसाठी एकूण ४८ निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून, गती व प्रगतिशील सरकार आहे व महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती देणारे सरकार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

येथील नीळकंठराव शिंदे पटांगणावर महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आ. सुभाष धोटे, आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सोयाबीनचा सहा हजार रुपये भाव देण्याचा प्रयत्न चालू आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजारांवरून २० हजार रुपये बोनस दिला. आता २५ हजार  रुपयांचा बोनस देण्याची तरतूद चालू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस १२ तास वीज देणार आहोत. त्यात कृषिपंपासाठी लागणाऱ्या विजेचे बिल द्यावे लागणार नाही. 

गोसीखुर्दचे पाणी आरमोरीला आणणार

गडचिरोली : छत्तीसगड, तेलंगणातून महाराष्ट्रात येताना गडचिरोली हा पहिला जिल्हा लागतो. त्यामुळे महाराष्ट्राचे हे शेवटचे टोक नाही, तर प्रवेशद्वार आहे. या भागातील विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. गोसीखुर्दचे पाणी आरमोरीत आणून सिंचन सुविधा उपलब्ध केल्या जातील, उद्योगांनाही चालना दिली जाईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

आरमोरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ देसाईगंज येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सज्जन आमदारांची विधानसभेत स्पर्धा घेतली तर कृष्णा गजबे हे पहिले येतील, असे सांगून फडणवीस यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करीत कृष्णा गजबेंना आशीर्वाद द्या, विकासाची गॅरंटी मी घेतो, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

मविआकडून मतांसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन

नागपूर : महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा अल्पसंख्यांकांच्या मतांवर डोळा असून त्यासाठी लांगूलचालनाची सर्वोच्च पातळी गाठली आहे.राष्ट्रहितासाठी सर्वांना एकजूट करावी लागेल व ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना महायुती प्रत्युत्तर देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, म्हणाले.

उलेमा कौन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी हे व्होट जेहादचे आवाहन करीत आहेत. धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस व्होट जिहाद करीत आहेत. नोमानी यांनी या पक्षांकडे १७ मागण्या दिल्या होत्या. मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, २०१२ ते २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील दंगलींमधील मुस्लिम आरोपींच्या केसेस काढून घेणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणे, अशा प्रकारच्या या मागण्या आहेत. देशाच्या इतिहासात निवडणुकीत मते मिळविण्यासाठी इतके लांगूलचालनपणा आम्ही बघितले नव्हते. त्याविषयी तथाकथित सेक्युलर काहीच का बोलत नाहीत, असा सवालही फडणवीस यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी