शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : उद्धव 'वर्षा'वर गेले अन् युतीचा मार्ग मोकळा झाला; फिफ्टी-फिफ्टी गुंडाळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 09:19 IST

लोकसभा निवडणुकीचा युतीचा फॉर्म्युला जाहीर करताना विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष फिप्टी-फिप्टी जागा (प्रत्येकी १४४) लढतील, असे भाजप व शिवसेनेच्याही शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर केले होते. तथापि...

- यदु जोशी मुंबई : लोकसभा निवडणुकीचा युतीचा फॉर्म्युला जाहीर करताना विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष फिप्टी-फिप्टी जागा (प्रत्येकी १४४) लढतील, असे भाजप व शिवसेनेच्याही शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर केले होते. तथापि, आता भाजपच्या वाट्याला १६४ जागा आल्या असून शिवसेना १२४ जागा लढेल. भाजप आपल्या कोट्यातून लहान मित्र पक्षांना जागा देईल. शिवसेनेला झुकवण्यात भाजपला यश आल्याचे त्यावरून स्पष्ट होते.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्र परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा (भाजप २५, शिवसेना २३) फॉर्म्युला मुंबईत पत्र परिषदेत जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी विधानसभेत दोन्ही पक्ष समसमान जागा लढतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात शिवसेनेला १२४ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. याचा अर्थ २० जागा त्यांना सोडाव्या लागल्या.लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजप आता राज्यात स्वबळावरच लढणार, असे चित्र निर्माण झाले होते. तथापि, मुख्यमंत्री फडणवीस हे सुरुवातीपासून युतीबाबत आग्रही होते. २०१४ मध्ये भाजपने १२२ तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या आणि युतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचे भाजपने सिद्ध केले. यावेळच्या जागावाटपानेही तेच अधोरेखित केले आहे. भाजप आपल्या वाट्याला आलेल्या १६४ पैकी रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना या लहान पक्षांना दहाएक जागा देईल, अशी शक्यता आहे.अलिकडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री गणेश नाईक यांना मंदा म्हात्रे यांच्या जागी बेलापूरमध्ये उमेदवारी हवी होती. शिवसेनेने या जागेवर हक्क सांगितला. नाईक नकोतच अशी भूमिकाही घेतली. शेवटी जागा भाजपकडेच ठेवायची आणि तिथे नाईक यांच्याऐवजी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच संधी द्यायची असा तोडगा काढण्यात आला. ठाण्याची जागा भाजपने शिवसेनेला दिली नाही.उद्धव ‘वर्षा’वर गेले अन् युतीचा मार्ग मोकळाशिवसेनेने १२६ जागांचा आग्रह धरला आणि भाजप १२० पेक्षा एकही जागा जास्त द्यायला तयार नव्हता. तसेच तीनचार जागांबाबत आणि उमेदवारांबाबतही वाद होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल रात्री १२ च्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. रात्री अडीचपर्यंत बसून दोघांनी वादाचे विषय निकाली काढले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना