शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; असे आहे मतांचे गणित, शिवसेना अन् काँग्रेसच सेफ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 10:12 IST

Vidhan Parishad Election Updates: विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. कोणाचे आमदार फुटणार, कोणाचे क्रॉस व्होटिंग करणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या असून आतापर्यंत भाजपासह इतर पक्षांच्या ३५ आमदारांनी मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार हॉटेलवरून विधान भवनाकडे निघाले आहेत. तर अजित पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदारही वाटेवर आहेत. 

विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे. भाजपाचे आमदार कुलाब्याच्या ताज प्रेसिडन्सीमध्ये तर शिवसेनेचे बांद्राच्या ताज लँड्समध्ये, उद्धव ठाकरेंचे परळच्या आयटीसी ग्रँड मराठा आणि अजित पवार गटाचे अंधेरीच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. सुरुवातीच्या सत्रात भाजपाचे आमदार मतदान करणार आहेत. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार मतदान करणार आहेत. मते फुटू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. 

दरम्यान, नवाब मलिक देखील विधानभवनात पोहोचले आहेत. मलिकांनी काल शरद पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यांनी शरद पवार, जयंत पाटलांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. यामुळे मलिक अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करतात की शरद पवारांच्या याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

हे आहेत रिंगणात

भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे काँग्रेस : प्रज्ञा सातव उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर शेकाप : जयंत पाटील 

मतांचे गणित काय...भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात. शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत.  शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वत:च्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे १५ आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे १६ मते आहेत. त्यांना आणखी सात मतांची जुळवाजुळव करावी लागेल.  अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्यांना आणखी सात मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे. उद्धवसेनेकडे १५ आमदार आहेत, त्यांना आणखी ८ मते लागतील. एक अपक्ष त्यांच्यासोबत आहेत. काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडे ३७ मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ २३ मते लागतील. याचा अर्थ काँग्रेसकडे १४ मते अतिरिक्त आहेत, ती कुठे वळतात यावर बरेच अवलंबून असेल.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना