शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

VIDEO : एसटीच्या आपत्कालीन खिडक्यांची ‘आफत’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 15:40 IST

जुन्या ‘एसटी’मध्ये एकच संकटकालीन दरवाजा आहे. दुर्दैवाने अपघात घडल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यास तो अपुरा ठरतो.

- राम देशपांडे
 
अकोला, दि. ९ -   जुन्या ‘एसटी’मध्ये एकच संकटकालीन दरवाजा आहे. दुर्दैवाने अपघात घडल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यास तो अपुरा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन, ताफ्यात नव्याने दाखल होणा-या प्रत्येक ‘एसटी’ला दोन आपत्कालीन खिडक्या लावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय निश्चित यथायोग्य म्हणावा लागेल; मात्र सध्या अस्तीत्वात असलेल्या आपत्कालीन खिडक्यांच्या स्थितीची तपासणी कोण करणार हाच प्रश्न आहे. महाड येथील दूर्घटना घडल्याच्या पृष्ठभूमीवर अकोल्यातील बसगाड्यांचे आपत्कालीन खिडक्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी स्टिंग केले असता या खिडक्या व दरवाजेच ‘आफत’ ठरतील असे असल्याचे वास्तव उघडकीस आले. 
महाराष्ट्रात मोठ्या शहरापासून लहान, दुर्गभ भागात दररोज हजारो एसटी बसेस धावतात. सुरक्षित प्रवास म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. प्रवासादरम्यान दुर्दैवाने एखादई आपत्ककालीन परिस्थितीत उद्भवल्यास प्रवाशांना वेळीच बाहेर पडता यावे याकरिता प्रत्येक बसला एक संकटकालीन दरवाजा असतो. काळानुरूप त्याची जागा बदलली. जुन्या बसगाड्यांमध्ये तो पाठीमागे असून, तर त्यानंतर दाखल झालेल्या गाड्यांमध्ये ही व्यवस्था चालकाच्या मागील असनाजवळ करण्यात आली आहे. ‘हिरकणी’, ‘आशियाड’, ‘रातराणी’ यांसारख्या केवळ एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चालकाच्या मागे व त्याच दिशेने अखेरच्या आसनाजवळ अशा दोन आपत्कालीन खिडक्या आहेत. स्टिंग आॅपरेशनदरम्यान ‘लोकमत’ चमूने नव्या व जुन्या बसस्थानकांसह दोन्ही आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांच्या आपत्कालीन खिडक्यांची उघड-झाप होते की नाही, याची चाचपणी केली. ज्यामध्ये जुन्या बसगाड्यांचे संकटकालीन दरवाजे देखभाल व दुरुस्तीअभावी ‘जाम’ (उघडेनासे) झाले असल्याचे वास्तव समोर आले. दुर्दैवाने अपघात घडल्यास, ज्यांची अकारण कधीच उघडझाप होत नाही, असे आपत्कालीन दरवाजे प्रवाशांकरिता ‘आफत’कालीन ठरणार असल्याचे धडधडीत वास्तव समोर आले आहे. 
ताफ्यात नव्याने दाखल होणºया प्रत्येक बसला दोन आपत्कालीन दरवाजे लावण्याचा निर्णय मुळीच चुकीचा नाही; मात्र जुन्या बसगाड्यांच्या आपत्कालीन दरवाजांना नियमित आॅइलिंगग, ग्रिसिंग होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘एआयएस-५२’(आॅटोमोबाइल इंडियन स्टँडर्ड-५२) या नियमानुसार आता ‘एसटी’ची बांधणी केली जात आहे. या नव्या नियमानुसार बसची बांधणी करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे बसची बांधणी अधिक मजबूत होणार हे निश्चित; मात्र सध्याच्या घडीला विभागातील ज्या गाड्या भंगार अवस्थेत धावत आहेत, त्यांमध्ये प्रवास करणा-यांच्या जिवाला घोर लाणार, हे ही तितकेच खरे!