शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

VIDEO - ... आणि त्यांना पुन्हा मिळाला हक्काचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 19:13 IST

ऑनलाइन लोकमत/ नवनाथ शिंदे   पिंपरी-चिंचवड, दि. 15 - ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पै-पै जमा केले.  त्यांनीच उतारवयात आई-वडिलांना ...

ऑनलाइन लोकमत/ नवनाथ शिंदे
 
पिंपरी-चिंचवड, दि. 15 - ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पै-पै जमा केले.  त्यांनीच उतारवयात आई-वडिलांना बेघर केले, अशा अवस्थेत खचून न जाता आई-वडिलांनी मुलांविरोधात लढा दिला. अखेर तहसीलदारांच्या कार्यवाहीनंतर सत्तरी पार केलेल्या पाटील दाम्पत्याला पुन्हा एकदा हक्काचा निवारा असलेले घर मिळाले. 
 
सुरेंद्र नरसगोंडा पाटील (वय 78) सुनंदा सुरेंद्र पाटील (वय 73) हे दाम्पत्य निगडीत राहते. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या मुलांनी त्यांना बेघर केले होते. उतारवयात दोघांनाही घराच्या माळावरील एका कोप-यात ठेवले. त्यामुळे त्यांची कुचंबना सुरू होती़ मुलांकडून या वयात अवहेलना होत असल्याने त्यांच्याविरोधात लढा देण्याचा निर्णय पाटील दाम्पत्याने घेतला. शासनाच्या ज्येष्ठ नागरिक चरित्रर्थ व कल्याणकारी कायद्यानुसार पाटील दाम्पत्याने हक्काचा निवारा मिळण्यासाठी 20 फेब्रुवारीमध्ये प्रांत कार्यालयाकडे अर्ज दाखल केला. पाटील यांनी केलेल्या अर्जावर  प्रांत कार्यालयाने तातडीने दखल घेतली. दोन्ही मुलांनी आई-वडीलांना पोटगी म्हणून प्रत्येकी अडीच हजार रूपये देण्याचा आदेश कार्यालयाने दिला. मात्र मुलांनी आदेशाने पालन न करता आई-वडीलांना पोटगीची रक्कम दिली नाही़, त्यामुळे पाटील दाम्पत्याने पुन्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यांकडे घराचा ताबा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला.
संपुर्ण प्रकरणाचा अभ्यास करून अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी 30 मे रोजी मुलांना घराचा ताबा आई-वडीलांकडे देण्याचा आदेश दिला. अतिरिक्त जिल्हाधिका-याच्या विरोधात पाटील यांच्या मुलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़. न्यायालयाने अतिरिक्त जिल्हाधिका-यांचा निर्णय कायम ठेवत घराचा ताबा पाटील दाम्पत्याला देण्याचा आदेश दिला. त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे  तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पोलिसांना आदेश देऊन मुलांना ताब्यातील घर सोडण्यास सांगितले. अखेर 8 नोव्हेंबरला पोलिसांच्या सहकार्याने घराचा ताबा पाटील दाम्पत्याला परत देण्यात आला.   
 
‘‘ज्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करून त्यांना शिक्षण देऊन मोठे केले. या मुलांसोबत उतारवयात संघर्ष करून हक्काचा निवारा मिळवावा लागला. याचे दु:ख वाटत आहे.’’ 
- सुरेंद्र व सुनंदा पाटील, ज्येष्ठ नागरिक. 
 
पिंपरी -चिंचवड शहरात आई-वडील व ज्येष्ठ नागरिक चरित्रर्थ व कल्याणकारी अधिनियमाद्वारे पहिल्यांच एका बेघर दाम्पत्याला पुन्हा एकदा हक्काचे घर मिळवून देण्यात प्रशासकीय यंत्रणोला यश आले. त्यामुळे एक चांगला संदेश समाजार्पयत जाणार आहे. 
- प्रशांत बेडसे, तहसीलदार.
 
असा आहे कायदा..
वृद्ध आई-वडिलांची अवहेलना आणि हेळसांड करणा:या नागरिकांवर ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणकारी’ अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते. अनेकदा ज्येष्ठांनी आयुष्यभर कमावलेली संपत्ती घेऊन मुले अथवा नातेवाईक त्यांची अवहेलना करतात. या वेळी शासनाची मदत घेऊन असाह्य व्यक्तींना आधार दिला जातो. या कायद्याची ताकद ऐवढी आहे की, आईवडिलांनी खरेदीखत करून दिले असलेतरी ते रद्दबातल ठरविण्याचा अधिकार आहे, अशी माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 

https://www.dailymotion.com/video/x844i1f