शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’च्या निकषात विदर्भ नापास! पुणे विद्यापीठाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 17:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जागतिक दर्जाचे २० विद्यापीठ बनविण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. मात्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विदर्भातील आठपैकी एकाही विद्यापीठाकडून याबाबत प्रस्ताव मागविला नाही. त्यामुळे केंद्राच्या...

 - गणेश वासनिक 

अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जागतिक दर्जाचे २० विद्यापीठ बनविण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. मात्र, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विदर्भातील आठपैकी एकाही विद्यापीठाकडून याबाबत प्रस्ताव मागविला नाही. त्यामुळे केंद्राच्या लेखी विदर्भातील ‘युनिव्हर्सिटी’ नापास आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे.विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ, नागपूरचे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस अँड युनिव्हर्सिटी  आणि  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अशी एकूण नऊ विद्यापीठे आहेत. केंद्र सरकार देशातील १० शासकीय व १० खासगी अशा २० विद्यापीठांना जागतिक दर्जाचे बनविणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या विद्यापीठांना १० हजार कोटींचे अनुदान केंद्र सरकारतर्फे मिळणार आहे. त्यासाठी विद्यापीठांकडून १२ डिसेंबरपूर्वी प्रस्ताव मागविले आहेत. राज्यातून पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने या यादीत स्थान मिळविण्यासाठी विशेष तयारी केली असून, या प्रक्रियेत बुधवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केंद्राशी संवाद साधल्याची माहिती कुलसचिव ए.डी. शाळीग्राम यांनी दिली. विद्यापीठाने इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅसेसमेंट सेल (आयक्यूएसी) च्या माध्यमातून विद्यापीठातील सोई-सुविधांचे आॅडिट केल्याचे शाळीग्राम यांनी सांगितले. राज्यातील एकूण २७ विद्यापीठांपैकी विदर्भात नऊ विद्यापीठ आहेत. असे असताना विदर्भातील एकाही विद्यापीठाला प्रस्ताव सादर करण्याची संधी मिळू नये, ही आश्चर्यकारक बाब मानली जात आहे. 

योजनेसाठी विद्यापीठाकडून प्रस्ताव पाठविण्याबाबत केंद्र सरकारचे पत्र प्राप्त झाले नाही. किमान स्पर्धेत सहभागी होण्याची संधी तरी मिळायला हवी. - मुरलीधर चांदेकर कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

मध्य भारतात नागपूर विद्यापीठ सर्वात जुने आहे. ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’च्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून कोणतेही पत्रव्यवहार झालेला नाही.- सिद्धार्थविनायक काणे कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठGovernmentसरकारIndiaभारत