शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

विदर्भाला ११ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता; औरंगाबादमधून संधी कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:24 IST

लाल दिवा भुसे की कांदेंना? पुणे, कोल्हापूर पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील?

कमलेश वानखेडे -नागपूर : भाजप व शिंदे गट एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे आता उपराजधानी नागपूरला किमान तीन मंत्रिपदे मिळतील व विदर्भालाही झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू, परिणय फुके, संजय कुटे या अनुभवी नेत्यांसह  समीर मेघे, आशिष जयस्वाल, रवी राणा यांच्या रूपात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांना कॅबिनेट मंत्रिपदासह नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळू शकते.    हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. मात्र, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांना संधी दिल्यास मेघे यांची अडचण होऊ शकते. अपक्ष गोटातून रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल व भंडाऱ्यातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.  राणा दाम्पत्याने शिवसेनेविरोधात एकाकी लढा दिला. याचे बक्षीस आमदार रवी राणा यांना मिळेल, असे दिसते. आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद देऊन पुनर्वसन केले जाऊ शकते. 

औरंगाबादमधून संधी कुणाला?एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता . औरंगाबादला कोण पालकमंत्री म्हणून लाभणार, यावरून चर्चा रंगते आहे. मागील १२ वर्षांत जिल्ह्याला बाहेरीलच पालकमंत्री लाभले आहेत. त्यामुळे नवीन सरकारमध्ये जिल्ह्यातील जे मंत्री होतील, त्यांच्याकडेच पालकमंत्री जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. आ. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने यांच्यासोबत गेलेल्या सर्वच मंत्र्यांची पदे तशीच राहण्याची शक्यता अधिक आहे. 

आ. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदे कायम राहून आ. संजय शिरसाट यांना एखादे खाते मिळू शकते. तर आ. अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब यांच्यापैकी आ. सावे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये अवघ्या चार महिन्यांसाठी आ. सावे हे उद्याेग राज्यमंत्री राहिले होते. विधानसभेनंतर कॅबिनेट होण्याची त्यांची संधी हुकली होती, ती आता पूर्ण होऊ शकते.

लाल दिवा भुसे की कांदेंना?नाशिक : ठाकरे सरकार उलथवून टाकण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या शिवसेना बंडखोरांमध्ये जिल्ह्यातील नांदगावचे आमदार सुहास कांदे व मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे लाल दिवा नांदगावला मिळतो की पुन्हा मालेगावलाच, याकडे लक्ष लागले आहे.

 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत सर्वप्रथम जिल्ह्यातून नांदगावचे आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे हे सहभागी झाले होते. त्यानंतर दादा भुसे यांनी शिंदे गटात एन्ट्री केली. दादा भुसे गेल्या साडेसात वर्षांपासून मंत्रिपद उपभोगत असल्याने फडणवीस नव्या चेहऱ्याला संधी देतात की ज्येष्ठताक्रमानुसार भुसे यांच्याच गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडते, याकडे लक्ष आहे. कांदे व भुसे या दोन बंडखोरांपैकी कुणाच्या तरी एकाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी शक्यता आहे.

पुणे, कोल्हापूर पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील?कोल्हापूर : भाजप-शिवसेना युतीच्या २०१४ ते २०१९ या काळात अनेक खात्यांचे मंत्रिपद सांभाळणारे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे आणि कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोल्हापूरच्या या पदासाठी ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे आणि विनय कोरे हे दोघेही प्रबळ दावेदार असताना पाटील यांच्याकडेच त्यांचा गृहजिल्हा देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करीत आहेत.

२०१४ नंतर राज्यातील युती सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे राज्यातील नंबर दोनचे मंत्री होते. त्यांच्याकडे कोल्हापूरसह सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर उमेदीच्या काळात जळगावमध्ये संघटनेच्या कामासाठी झोकून देणाऱ्या पाटील यांच्यावर जळगावच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आली. 

कोल्हापूर जिल्ह्यात आता मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित आहे. तसेच प्रकाश आवाडे, विनय कोरे हे भाजपकडून, तर राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि प्रकाश आबिटकर हे शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठीचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. राजेश क्षीरसागर सध्याच्या पदासाठी पुन्हा आग्रही आहेत.  जिल्ह्याच्या मंत्रिपदांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा