शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अजित पवार गटाला बसणार फटका; विदर्भातील १० जिल्हाध्यक्ष पक्ष अन् सरकारवर नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:08 IST

आजच्या जिल्हाध्यक्ष बैठकीत आम्ही जे काही ठराव मांडू त्याबद्दल आमचे विदर्भातील नेते प्रफुल पटेल आणि संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना वेळ देऊन व्यथा मांडणार आहे.

नागपूर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या काही दिवसांत जाहीर होतील मात्र त्याआधीच महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील पदाधिकारी पक्ष आणि महायुती सरकारवर नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विदर्भातील १० जिल्हाध्यक्ष याबाबत बैठक घेणार आहेत. ते पक्ष आणि सरकारवर नाराज असल्याचं बोललं जातं. 

याबाबत जिल्हाध्यक्ष बाबा गुजर म्हणाले की, पक्षावर नाराजीचा प्रश्न नाही. सध्या जे महायुतीचे सरकार आहे. त्यात जिल्हाध्यक्षांना ज्या कामांची अपेक्षा होती ती कामे पूर्ण होत नाहीत. आमच्या पक्षाचे मंत्री असले किंवा महायुती सरकारमधील मंत्री असले ते आमच्या जिल्हाध्यक्षांची कामे करत नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभेत विदर्भातून आम्हाला एकही जागा मिळाली नाही. भविष्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाला जागा सुटणार की नाही हा देखील जिल्हाध्यक्षांसाठी महत्त्वाचा विषय आहे. जिल्हा नियोजन निधी, संघटनांचा विषय, विधान परिषदेवर विदर्भातील एकाला संधी द्यावी, अशा माणसाला संधी द्या ज्याचा संघटनेला फायदा झाला पाहिजे. उगाच जवळ फिरणाऱ्याला दिले तर त्याचा संघटनेला फायदा होणार नाही आणि संघटना विदर्भात वाढणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनं याआधी विदर्भात ज्यांना संधी दिली त्यांचा फायदा संघटनेला झाला नाही. विदर्भात आम्हाला एक विधान परिषदेची आमदारकी हवी. आजच्या जिल्हाध्यक्ष बैठकीत आम्ही जे काही ठराव मांडू त्याबद्दल आमचे विदर्भातील नेते प्रफुल पटेल आणि संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना वेळ देऊन व्यथा मांडणार आहे. जिल्हा नियोजन समितीत अजित पवारांच्या पक्षाचे सदस्य पाठवलेले असतील तर त्यांना काहीच निधी मिळत नसेल तर संघटना चालवायची कशी असा प्रश्न बाबा गुजर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, निधी विषयात दादांशी बोलणं झालं असून त्यांनी लक्ष घालून जिल्हाध्यक्षांना निधी वाटप करावे अशी मागणी केली आहे. संघटनेत राहून आरोप करत नाही, मात्र सर्व जिल्हाध्यक्षांचा अनुभव हा कुठल्याही मंत्र्यांकडे गेले तरी काम होत नाही असा आहे. चहापेक्षा किटली गरम म्हणजे मंत्र्यांच्या पीए असतात. आम्ही अजितदादांना सोडून जाणार नाही. प्रफुल पटेल हे आमचे मार्गदर्शक आहे. आमच्या जिल्हाध्यक्षांची जी अडचण आहे ती आम्ही संघटनेकडे मांडतोय, आमच्या व्यथा दुसऱ्यांना सांगणार का असा सवालही बाबा गुजर यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती