शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पावसामुळे भाजीपाल्याची दरवाढ सुरूच; मागणीच्या तुलनेमध्ये बाजारपेठांमध्ये आवक घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:46 IST

पुढील दोन ते तीन दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता आहे

नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या व्यापारावरही होऊ लागला आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची दरवाढ सुरूच आहे. वाटाणा किरकोळ मार्केटमध्ये प्रतिकिलो १५० ते १६० रूपयांवर तर गवार १०० ते १२० रूपयांवर पोहोचली आहे.मुंबई बाजार समितीमध्ये ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच दरवाढ सुरू झाली आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. मागणीच्या तुलनेमध्ये बाजारपेठांमध्ये आवक कमी होत आहे. मुंबई बाजार समितीत सद्य:स्थितीमध्ये ४५० ते ५०० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. नाशिक, पुणे, सातारा व इतर ठिकाणांवरून कृषी माल विक्रीसाठी येत आहे. खरेदीच्या ठिकाणीच मालाची किंमत वाढल्यामुळे बाजार समितीमध्येही दर वाढत आहेत.

पुढील दोन ते तीन दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण वाढले तरी पिकांचे नुकसान होऊन दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० ते ६०, बीट ८०, गाजर ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. गवार १०० ते १२०, दोडका ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसvegetableभाज्या