शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
3
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
4
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
5
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
6
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
7
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
8
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
9
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
10
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
11
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
12
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
14
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
15
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
16
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
17
अलिबागमधील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बिबट्याचा धुमाकूळ, दोन जणांवर हल्ला
18
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
19
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
20
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
Daily Top 2Weekly Top 5

“विधान दुर्दैवी, योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”; प्रकाश आंबेडकरांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:57 IST

Prakash Ambedkar News: असंवेदनशील मंत्री योगेश कदमांना मंत्रिमंडळात का ठेवावे? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला विचारला पाहिजे, असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला.

Prakash Ambedkar News: स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात तीन दिवसांनंतर अखेर पोलिसांना यश आले आहे. आरडाओरडा केला नाही म्हणून अत्याचार झाला. विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो. काहीतरी दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची आपल्याला माहिती आहे. परंतु, अशावेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतेही आरडाओरडा, कुठलेही फोर्स, असे काही घडलेले नाही, असे बेजबाबदार वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.

पोलिसांना एक आरोपी पकडण्यासाठी श्वान पथकाची गरज लागते. शंभर पोलिसांची गरज लागते. अनेक अधिकारी त्यांना लागले अशी परिस्थिती आहे. यावरून एकच स्पष्ट होत आहे की, पोलीस खाते कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या ऐवजी अजून काय काय करते? याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

पुण्याच्या घटनेसंदर्भात योगेश कदम यांनी जे संवेदनशील वक्तव्य केले, ते दुर्दैवी आहे. कुठल्याही घटनेवर सामान्य माणूस शोक व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, मंत्रिपदावर बसलेले मंत्री असे वक्तव्य करतात. त्यातून पोलीस खात्याला आणि आरोपीला बळ मिळते. असंवेदनशील मंत्री योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावे? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, योगेश कदम जे बोलले, त्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला हवे. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते की, हा गजबजलेला परिसर आहे, आजूबाजूला बरेच लोक होते, ती बस आतमध्ये कुठे उभी नव्हती, तर बाहेरच होती. पण, ही घटना घडतेय हे लोकांच्या लक्षात आले नाही, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा माझा समज आहे. तथापि, योगेश कदम नवीन आहेत. तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईन की, अशा प्रकरणात बोलताना थोडे जपून, संवेदनशीलपणे बोलले पाहिजे. आपण बोलताना चूक झाली, तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. कोणत्याही लोकप्रतिनिधीने या अशा घटनांवर बोलताना संवेदनशीलपणे बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसYogesh Kadamयोगेश कदमswargate bus depotस्वारगेट बसस्थानक