शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

“मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी”: प्रकाश आंबेडकर, मतदारसंघही सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 15:56 IST

Prakash Ambedkar And Manoj Jarange Patil News: सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Prakash Ambedkar And Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होत होता. प्रकृती खालवली असली तरी जरांगे यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी करण्यास नकार दिला. असे असताना दुसरीकडे राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना आगामी लोकसभानिवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. 

सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मराठा समाजाचा प्रश्न हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. शासानाने कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन निर्णय काढला होता. शिंदे समितीमार्फत आमचे काम चालू आहे, असे सरकारकडून सांगितले जात आहे. लोकसभेची निवडणूक संपल्यावर या प्रश्नाकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होईल. सत्तेतवर राहिलेल्या मराठ्यांनी या प्रश्नाला डावलेले आहे. लोकसभा, विधानसभेची निवडणूक झाली की पुन्हा या समस्येकडे दुर्लक्ष करता येईल, असा त्यांचा विचार आहे. त्यामुळेच मनोज जरांगेंनी लोकसभेची उमेदवारी जाहीर करावी, असा निरोप आम्ही त्यांच्याकडे पाठवलेला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते मीडियाशी बोलत होते.

मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी

आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली. आता आरक्षण मिळवण्याचा भाग आहे असे आम्ही मानतो. जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता स्वतंत्रपणे लढवली पाहिजे. कोणत्याही पक्षाच्या आधाराने लढले, तर त्या पक्षांची बंधने येतात आणि बंधने असली की, गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी अपेक्षा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गरीब मराठ्यांचे आणि ओबीसींचे ताट वेगळे हवे, पक्षाच्या वतीने आम्ही भूमिका जाहीर केली आहे की, ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तसे झाले तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळे असावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक