शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

“अद्याप गृहमंत्र्यांनी माफी मागितली नाही, पंतप्रधानांनी खोटे बोलू नये”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 16:59 IST

VBA Prakash Ambedkar News: पुतळा पाडला की पडला, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

VBA Prakash Ambedkar News: धर्म आणि जात पुन्हा दिसू लागला आहे. सत्ताधारी पक्ष स्वतः विरोधातच आंदोलन करताना दिसत आहे. तुमचीच सत्ता आहे. दाखवण्यासाठी तुम्ही विरोधकांविरोधात आंदोलन करत आहात. सांगली येथे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझे सरळ मत असे आहे की, तो पुतळा पाडला की पडला, याचीही चौकशी झाली पाहिजे. आम्ही आतापर्यंत अनेक पुतळ्यांची उद्घाटने केली आहेत. पण ते कधी पडले नाहीत. हा धातूचा पुतळा असून कसा पडला, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. जातिजनगणनाबाबत प्रश्न विचारला असता, निवडणुकीच्या तोंडावर ते विधान केले आहे. पंतप्रधानांनी आणि त्यांच्या सरकारने खोटे बोलू नये. तुम्ही पंतप्रधान आहात. पंतप्रधानांना आणि त्यांच्या कॅबिनेटला अशी बातमी देणे शोभत नाही. जातिजनगणना करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे तुम्ही बोलतात ते मान्य करायचे की, न्यायालयात सांगितले ते मान्य करायचे, अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत ही परिस्थिती निर्माण होईल

ओबीसींसाठी दौरे करीत आहे. सर्व पक्ष ओबीसी आणि जरांगे यांच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत. ओबीसी आणि मराठामध्ये हा रोष पसरत चालला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या समूहातील लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. वरिष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षाचे काम केले. वर्गीकरण बरोबरच क्रिमिलियर ही अट घालण्यात आली. जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना जाब विचारला. लोकसभा पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत ही परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकार या परिस्थितीला कंट्रोल करण्यात फेल झाले आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

दरम्यान, महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या बाबतीत RSS आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. हिंसेची भाषा करणे म्हणजे समाजात तेढ निर्माण होत आहे. नितीन गडकरी यांच्या खात्यातील रिपार्ट आला आहे. त्याची चर्चा कुठे नाही. मनमोहनसिंग यांच्या काळातील चर्चा होते. गडकरी हे विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्याची चर्चा होत नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरsindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज