शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

“अद्याप गृहमंत्र्यांनी माफी मागितली नाही, पंतप्रधानांनी खोटे बोलू नये”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 16:59 IST

VBA Prakash Ambedkar News: पुतळा पाडला की पडला, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

VBA Prakash Ambedkar News: धर्म आणि जात पुन्हा दिसू लागला आहे. सत्ताधारी पक्ष स्वतः विरोधातच आंदोलन करताना दिसत आहे. तुमचीच सत्ता आहे. दाखवण्यासाठी तुम्ही विरोधकांविरोधात आंदोलन करत आहात. सांगली येथे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझे सरळ मत असे आहे की, तो पुतळा पाडला की पडला, याचीही चौकशी झाली पाहिजे. आम्ही आतापर्यंत अनेक पुतळ्यांची उद्घाटने केली आहेत. पण ते कधी पडले नाहीत. हा धातूचा पुतळा असून कसा पडला, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. जातिजनगणनाबाबत प्रश्न विचारला असता, निवडणुकीच्या तोंडावर ते विधान केले आहे. पंतप्रधानांनी आणि त्यांच्या सरकारने खोटे बोलू नये. तुम्ही पंतप्रधान आहात. पंतप्रधानांना आणि त्यांच्या कॅबिनेटला अशी बातमी देणे शोभत नाही. जातिजनगणना करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे तुम्ही बोलतात ते मान्य करायचे की, न्यायालयात सांगितले ते मान्य करायचे, अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत ही परिस्थिती निर्माण होईल

ओबीसींसाठी दौरे करीत आहे. सर्व पक्ष ओबीसी आणि जरांगे यांच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत. ओबीसी आणि मराठामध्ये हा रोष पसरत चालला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या समूहातील लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. वरिष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षाचे काम केले. वर्गीकरण बरोबरच क्रिमिलियर ही अट घालण्यात आली. जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना जाब विचारला. लोकसभा पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत ही परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकार या परिस्थितीला कंट्रोल करण्यात फेल झाले आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

दरम्यान, महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या बाबतीत RSS आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. हिंसेची भाषा करणे म्हणजे समाजात तेढ निर्माण होत आहे. नितीन गडकरी यांच्या खात्यातील रिपार्ट आला आहे. त्याची चर्चा कुठे नाही. मनमोहनसिंग यांच्या काळातील चर्चा होते. गडकरी हे विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्याची चर्चा होत नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरsindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज