शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

राजू शेट्टींना आघाडीपेक्षा 'वंचित'चा पर्याय जवळचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 13:08 IST

राजू शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. विधानसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्ट केले असून विधानसभा निवडणुकीत संघटनेतील अधिकाधीक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघाटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना पराभव सहन करावा लागला. शेट्टी यांचा लोकसभेतील पराभव संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. परंतु, हा पराभव बाजुला सारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी चर्चा देखील सुरू आहे. मात्र राजू शेट्टींसाठीवंचित बहुजन आघाडीच जवळचा पर्याय असल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या मत विभाजनामुळे राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेला वंचितने घेतलेली मते आघाडीची चिंता वाढविणारेच आहेत. त्यामुळे वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न आघाडीकडून करण्यात आले. परंतु, त्याला अद्याप यश आले नाही. लोकसभेला राजू शेट्टी आघाडीसोबत होते. आता विधानसभेला देखील शेट्टी यांनी आघाडीसोबत जाण्याची तयारी सुरू केली असली तरी प्रकाश आंबेडकर आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीमुळे शेट्टी यांची धाव नेमकी कुणीकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शेट्टी यांनी वंचितला सोबत घेतले तर आघाडीत येईल असा इशाराही दिला होता.

राजू शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. विधानसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्ट केले असून विधानसभा निवडणुकीत संघटनेतील अधिकाधीक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न आहे. यामुळे स्वाभिमानीचे पक्ष संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्यास फायदाच होईल. मात्र आघाडीतून त्यांना ३५ जागा मिळतील यावर शंका आहे. परंतु राजू शेट्टी वंचितसमोबत गेल्यास त्यांचा ३५ जागाचा लढविण्याचा इरादा पूर्ण होऊ शकतो. याचा फायदा पक्षसंघटन वाढविण्यासाठी होणार आहे. त्यामुळे शेट्टी यांच्यासाठी तरी आघाडीपेक्षा वंचितचा पर्यायच जवळचा आहे.

आघाडीचा फॉर्म्युला ठरेना

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांनी विविध यात्रा काढल्या. तर वंचित बहुजन आघाडीने अनेक मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती उरकल्या आहेत. परंतु, आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नाही. त्यामुळे घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानीने अद्याप काहीही भूमिका स्पष्ट केली नाही.