शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

“संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा”; वंचितचा ठराव, मनोज जरांगेंना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:03 IST

Vanchit Bahujan Aghadi News: समग्र आरक्षणाच्या बचावासाठी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, असे ठरावात म्हटले आहे.

Vanchit Bahujan Aghadi News: ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत. तर, सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, यासाठी मनोज जरांगे आग्रही असून, सगेसोयरेंचा जीआर काढल्यास मुंबई जाम करू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. यातच आता सगेसोयरे अध्यादेश संविधानाची चौकट मोडणारा असून, तो रद्द करावा, यासाठी वंचित बहुजन आघाडीने ठराव केला आहे. 

वंचित बहुजन आघाडीने एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. परंतु, विरोधकांनी या बैठकीला उपस्थिती लावली नाही. महाविकास आघाडीच्या या निर्णयावर मनोज जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली होती. प्रकाश आंबेडकर हे मनोज जरांगेंना सल्ले, सूचना देत असतात. आपली मते स्पष्ट शब्दांत व्यक्त करत असतात. मात्र, वंचितने सगेसोयरे अध्यादेशाविरोधात केलेला ठराव मनोज जरांगेंसाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा

आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. तो सरकारी कार्यक्रम नाही. त्यामुळेच संवैधानिक चौकटीने दिलेल्या मार्गदर्शक नियमांना छेद देऊन अध्यादेश काढता येत नाहीत. जात प्रमाणपत्रासाठी रक्ताच्या नातेवाईकांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जातात. त्यात "सोयरे" ग्राह्य धरले जात नाहीत. सोयऱ्यांना आरक्षण ही मागणी असंवैधानिक / बेकायदेशीर आहे. सगेसोयरे यांना आरक्षण ही मागणी फक्त ओबीसी विरोधातील नाही, तर समस्त आरक्षणाच्या चौकटीला धक्का लावणारी आहे. या मागणीने आरक्षणाच्या मुख्य चौकटीलाच धोका निर्माण होतो. वंचित बहुजन आघाडी समग्र आरक्षणाच्या बचावासाठी उभी आहे. म्हणूनच "सगेसोयरेचा" अध्यादेश रद्द करावा असा ठराव वंचित बहुजन आघाडीने केला आहे, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. 

दरम्यान, कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही, याबाबत सरकारशी बोलणं झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, मराठ्यांची अडवणूक करु नका. आमचे नुकसान झाले तर आता सहन करणार नाही. सरकारचे डोळे दोन बोट घालून उघडीन, मग त्यांना दिसेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर