शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

“संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा”; वंचितचा ठराव, मनोज जरांगेंना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:03 IST

Vanchit Bahujan Aghadi News: समग्र आरक्षणाच्या बचावासाठी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, असे ठरावात म्हटले आहे.

Vanchit Bahujan Aghadi News: ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत. तर, सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, यासाठी मनोज जरांगे आग्रही असून, सगेसोयरेंचा जीआर काढल्यास मुंबई जाम करू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. यातच आता सगेसोयरे अध्यादेश संविधानाची चौकट मोडणारा असून, तो रद्द करावा, यासाठी वंचित बहुजन आघाडीने ठराव केला आहे. 

वंचित बहुजन आघाडीने एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. परंतु, विरोधकांनी या बैठकीला उपस्थिती लावली नाही. महाविकास आघाडीच्या या निर्णयावर मनोज जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली होती. प्रकाश आंबेडकर हे मनोज जरांगेंना सल्ले, सूचना देत असतात. आपली मते स्पष्ट शब्दांत व्यक्त करत असतात. मात्र, वंचितने सगेसोयरे अध्यादेशाविरोधात केलेला ठराव मनोज जरांगेंसाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा

आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. तो सरकारी कार्यक्रम नाही. त्यामुळेच संवैधानिक चौकटीने दिलेल्या मार्गदर्शक नियमांना छेद देऊन अध्यादेश काढता येत नाहीत. जात प्रमाणपत्रासाठी रक्ताच्या नातेवाईकांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जातात. त्यात "सोयरे" ग्राह्य धरले जात नाहीत. सोयऱ्यांना आरक्षण ही मागणी असंवैधानिक / बेकायदेशीर आहे. सगेसोयरे यांना आरक्षण ही मागणी फक्त ओबीसी विरोधातील नाही, तर समस्त आरक्षणाच्या चौकटीला धक्का लावणारी आहे. या मागणीने आरक्षणाच्या मुख्य चौकटीलाच धोका निर्माण होतो. वंचित बहुजन आघाडी समग्र आरक्षणाच्या बचावासाठी उभी आहे. म्हणूनच "सगेसोयरेचा" अध्यादेश रद्द करावा असा ठराव वंचित बहुजन आघाडीने केला आहे, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. 

दरम्यान, कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही, याबाबत सरकारशी बोलणं झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, मराठ्यांची अडवणूक करु नका. आमचे नुकसान झाले तर आता सहन करणार नाही. सरकारचे डोळे दोन बोट घालून उघडीन, मग त्यांना दिसेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर