शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंसमोरच प्रकाश आंबेडकरांनी दिले शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, “या लढ्याकडे...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:24 IST

Maharashtra News: शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानाला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले.

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले. 

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, मी या भानगडीत पडत नाही, असे म्हटले होते. यावर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे समोर असताना शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली. ही प्रतिक्रिया नवीन नाही. आमच्या दोघांचे भांडण फार जुने आहे. हे शेतातील भांडण नाही, नेतृत्वातील भांडण आहे, दिशेचे भांडण आहे. ते आमच्याबरोबर येतील अशी आशा बाळगतो. कारण या लढ्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. एक दिवस प्रत्येकाचा अंत होणार आहे. तसाच एक दिवस नरेंद्र मोदींचाही अंत होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच एखाद्या नेत्याने खरेच पैसे खाल्ले असेल तर त्याच्यावर जरूर कारवाई करा आणि न्यायालयात नेऊन तुरुंगात टाका. मात्र, न्यायालयात न्यायचे नाही, तुरुंगात टाकायचे नाही, केवळ नेतृत्वाचे प्रतिमाहनन करायचे. आताच्या घडीला दुर्दैवाने ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रकार सुरू आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

दरम्यान, नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले आणि चंद्रशेखर गेले तेव्हा मी खासदार झालो. आम्ही पहिला आवाज तेव्हाचे टेलिकॉम मंत्री यांच्याविरोधात उठवला. १५ दिवसांनी सभागृह बंद केले. नरसिंहराव आणि आमचे चांगले संबंध होते. त्यांनी महिनाभरानंतर बोलावून घेतले आणि विचारले की, तुम्ही काय केले? त्यावर आम्ही सभागृह बंद केले, त्यानंतर तुम्ही पुढे काय केले असे सांगण्याची मागणी केली. नरसिंहरावांनी आम्हाला पुन्हा बोलावून सांगितले की, तुम्ही असेच केले तर देशातील राजकीय नेतृत्व संपेल. सध्या राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रकार देशात सुरू आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीShiv Senaशिवसेना