शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंसमोरच प्रकाश आंबेडकरांनी दिले शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, “या लढ्याकडे...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:24 IST

Maharashtra News: शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानाला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले.

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले. 

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, मी या भानगडीत पडत नाही, असे म्हटले होते. यावर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे समोर असताना शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली. ही प्रतिक्रिया नवीन नाही. आमच्या दोघांचे भांडण फार जुने आहे. हे शेतातील भांडण नाही, नेतृत्वातील भांडण आहे, दिशेचे भांडण आहे. ते आमच्याबरोबर येतील अशी आशा बाळगतो. कारण या लढ्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. एक दिवस प्रत्येकाचा अंत होणार आहे. तसाच एक दिवस नरेंद्र मोदींचाही अंत होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच एखाद्या नेत्याने खरेच पैसे खाल्ले असेल तर त्याच्यावर जरूर कारवाई करा आणि न्यायालयात नेऊन तुरुंगात टाका. मात्र, न्यायालयात न्यायचे नाही, तुरुंगात टाकायचे नाही, केवळ नेतृत्वाचे प्रतिमाहनन करायचे. आताच्या घडीला दुर्दैवाने ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रकार सुरू आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

दरम्यान, नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले आणि चंद्रशेखर गेले तेव्हा मी खासदार झालो. आम्ही पहिला आवाज तेव्हाचे टेलिकॉम मंत्री यांच्याविरोधात उठवला. १५ दिवसांनी सभागृह बंद केले. नरसिंहराव आणि आमचे चांगले संबंध होते. त्यांनी महिनाभरानंतर बोलावून घेतले आणि विचारले की, तुम्ही काय केले? त्यावर आम्ही सभागृह बंद केले, त्यानंतर तुम्ही पुढे काय केले असे सांगण्याची मागणी केली. नरसिंहरावांनी आम्हाला पुन्हा बोलावून सांगितले की, तुम्ही असेच केले तर देशातील राजकीय नेतृत्व संपेल. सध्या राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रकार देशात सुरू आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीShiv Senaशिवसेना