शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका अन् राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 08:52 IST

काँग्रेसचे जे बगलबच्चे आहेत. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेत त्यांना माझा सवाल आहे की, तुमची नेमकी भूमिका सांगा असं प्रकाश आंबेडकरांनी ठणकावले.

बीड - काँग्रेसवालेराहुल गांधीचे गुणगान गातात. फार चांगली गोष्ट आहे. राहुल गांधींना निर्णय घेण्याचे शिकवा. एकाबाजूला राहुल गांधी अदानींविरोधात आंदोलन करतोय. अदानींची अर्थव्यवस्था ही देशाला धोक्यात आणतोय म्हणून सांगतोय. चूक नाही बरोबर सांगतायेत. ते चुकीचे सांगत नाही. परंतु ज्याच्यासोबत राहुल गांधींनी मैत्री केली असा NCP म्हणतंय, अदानीशिवाय दुसरा चांगला माणूस नाही. त्याच्या उद्धाटनाला मी जाणार आहे. तो राहुल गांधींच्या छाताडावर नाचायला सुरुवात करतो ही आजची परिस्थिती अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. बीड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एकतर तुम्ही अदानींच्या बाजूने आहात किंवा विरोधात आहे. जे विरोधात आहे ते एकाबाजूने, तुम्हाला एक बाजू घेतली पाहिजे. पण हा राहुल गांधी निर्णय घेऊ शकत नाही. कुठल्या बाजूला जायचे आणि कुठे नाही. राहुल गांधी अदानींना विरोध करतात. शरद पवार पाठिंबा देतात आणि हे दोघे म्हणतात आमची राजकीय युती आहे. तलवारीमध्ये एकच म्यान लागते. एका म्यानात २ तलवारी राहत नाही. ज्याला निर्णय करता येत नाही. तो या देशाचे नेतृत्व कसं करणार? हा साधा प्रश्न आहे, फार मोठा निर्णय नाही. साध्या प्रश्नावर राहुल गांधींना निर्णय करता येत नसेल तर त्याच्या काँग्रेसनं आमच्या नादी लागू नये असा टोला त्यांनी लगावला.

त्याचसोबत ज्यांना राजकीय निर्णय करता येत नाही ते नरेंद्र मोदींविरोधात काय लढणार आहे? ते अमित शाहांच्या अंगावर तुम्ही कसे जाणार आहे. ज्याच्या स्वत:च्या खेळाचे मैदान करता येत नाही तो म्हणतो मी क्रिकेट खेळायला चाललोय. कुणाला मित्र करायचे आणि कुणाला नाही हे अजून ठरतच नाही. येत्या कालावधीत एक गोष्ट नक्की, इंडिया टिकते की नाही याचा निकाल त्याठिकाणी लागतो. काँग्रेस लालू-नितीश बरोबर राहील. पण काँग्रेस ममता बॅनर्जींसोबत राहील का हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या राज्यात युती झालीय ती काँग्रेस टिकवेल की नाही हा खरा प्रश्न आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

दरम्यान, काँग्रेसचे जे बगलबच्चे आहेत. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेत त्यांना माझा सवाल आहे की, तुमची नेमकी भूमिका सांगा. आम्हाला म्हणतायेत, एका पत्राने युती होते का? मग कशाने होते? एकमेकांना सांगूनच युती होते ना...आम्ही चिठ्ठी लिहिली, आम्ही तुमच्यावर प्रेम करायला मागतोय, तुम्ही आमच्यावर प्रेम करा. काँग्रेसला प्रेम करण्यासाठी मोदींनी परवानगी लागते. त्यांनी परवानगी दिली तर ते आपल्यावर प्रेम करतील. जर प्रेम केले नाही तर आमचा मार्ग मोकळा आहे. आपल्याला आपला मार्ग करायचा असेल तर, उद्याची लढाई आपल्याला जिंकायची असेल, संविधान टिकवायचे असेल तर ही निर्णायक लढाई आहे. हा येड्यागबाळ्याचा खेळ नाही. टिंगळटवाळीचा वेळ नाही. उद्याचा काळात माझा मानसन्मान १ किलो मटण, निवडणुकीतील दारूसाठी इमान गहाण ठेवायचा का हे आपल्याला ठरवायचे आहे असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेसला इशारा दिला.

मोदींना हिमालयात पाठवून द्या

 लोकसभेची निवडणूक जसजसं जवळ येईल तसतशी या देशातील परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्यासारखी होईल. आता RSS चा नवीन प्रचार सुरू झालाय. मोदींना तिसरी टर्म मिळणार, २ वर्ष पंतप्रधान राहणार त्यानंतर साधू होऊन हिमालयात निघून जातील असा प्रचार चाललाय. तुम्ही २ वर्ष कशाला सांगताय? तुम्ही आत्ताच त्यांना हिमालयात पाठवून द्या. या देशाचे भले होईल असं आरएसएसवाल्यांना प्रकाश आंबेडकरांनी आव्हान दिले.

काँग्रेस नेते मोदींच्या सांगण्यावर वागतात

ईडीच्या चौकशीला कोण कोण गेले? मध्यंतरी सोशल मीडियात अशी एक पोस्ट फिरत होती. त्यात काँग्रेसमधल्या जेवढ्यांवर चौकशी होती त्यांचे नाव आणि फोटो होते. ज्यांची नावे होती त्यांना मोदींनी म्हटलं, माझ्याविरोधात जाताय जा, एप्रिल महिन्यापर्यंत मी या देशाचा पंतप्रधान कायम आहे. त्याच्यामुळे मी सांगतो तसं वागायचे नसेल तर तिहार जेलचा मार्ग मोकळा आहे. कुठला मार्ग ठरवायचा ते तुम्ही सांगा, मोदी सांगतील तो मार्ग ते स्वीकारतील. तुम्ही वेगळे लढा असं मोदींनी त्यांना सांगितले आहे असा आरोपही आंबेडकरांनी केला आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी