शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Vidhan Sabha 2019: आंबेडकर-ओवेसी 'वंचितचं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 14:19 IST

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मुंबई - वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम लोकसभा निवडणुकीत एकत्र लढले होते. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या दोन्ही पक्षात युती होणार असल्याचे बोलले जात असतानाच, सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचे कारण देत एमआयएमने वंचित बहुजन आघडीसोबत जाणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे. मात्र असे असले तरीही एमआयएमने एकामागे एक उमेदवार जाहीर करण्याचा जो धडाका लावला आहे, त्यावरून ही युती होण्याची शक्यता कमी आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील युती पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र एकीकडे खासदार जलील म्हणत आहे की, आंबेडकर हे एमआयएम प्रमुख ओवेसी यांचा फोन उचलत नाही. तर दुसरीकडे निर्णय एमआयएमला घ्यायचा असून आमची दारे अजूनही उघडे असल्याचा दावा आंबेडकर करत आहेत.

दोन्ही पक्षातील नेते युती तुटल्याचा खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एमआयएमने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे सुरु केले आहे. इम्तियाज जलील यांनी आतापर्यंत ७ उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आता ओवेसी यांनी ५ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे एमआयएमने प्रकाश आंबेडकर यांची वाट न पाहता एकट्या लढण्याची तयारी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील युतीचा निर्णय वंचित राहणार असल्याची चर्चा आहे.