शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
2
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
3
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
4
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
5
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
6
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
7
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
8
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
9
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
10
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
11
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
12
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
13
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
14
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
15
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
16
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
17
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
19
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
20
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स

मराठा समाजाची वज्रमूठ भक्कम

By admin | Updated: April 20, 2017 01:08 IST

महागोलमेज परिषदेत व्यक्त झाल्या भावना

कोल्हापूर : मराठा समाजातील असंतोष मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडला आहे. आपले नाही तर आपल्या पुढच्या पिढीचे चांगले होईल, हीच भावना प्रत्येक सामान्य मराठा समाजातील व्यक्तींची आहे. प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा, पद, हेवे-दावे, राजकारण बाजूला ठेवून ‘मराठा’ समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र आल्याने, आता ‘मराठा’ समाजाची वज्रमूठ भक्कम झाल्याची भावना बुधवारी महागोलमेज परिषदेत व्यक्त झाली. तब्बल आठ तास चाललेल्या परिषदेत समाजाच्या विविध मागण्यांबाबत विचारमंथन झाले. येथील मुस्कान लॉन येथे क्षत्रिय मराठा चेंबर्स आॅफ कॉर्मसच्या पुढाकाराने सकल मराठा समाज महागोलमेज परिषद झाली. अध्यक्षस्थानी शशिकांत पोवार होते. परिषदेला राज्यातील सुमारे पाचशे सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील विविध सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांना शेती, शिक्षण, व्यवसाय, उद्योग आणि आरक्षण या विषयांवर आपल्या नव्या कल्पना व सूचना केल्या. यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये पुणे येथील आप्पासाहेब पुणेकर म्हणाले, ज्या-ज्या वेळेला याचिकाकर्ते याचिका न्यायालयात दावे दाखल करतील त्याची माहिती सोशल मीडियाद्वारे द्यावी. ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी याचिका दाखल करावी मात्र आपल्या याचिकेमुळे मराठा समाजाचे आरक्षण लांबले जाणार नाही याची काळजी घ्यावी.औरंगाबाद येथील रवींद्र काळे-पाटील म्हणाले, दुभंगलेली मने व दुरावलेली माणसे एकत्र येण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. एकीची वज्रमूठ अधिक घट्ट होणार आहे. सोशल मीडियावरील सकल मराठा समाजाबाबतची आचारसंहिता करण्यात यावी. संभाजीनगरचे किशोर शितोळे म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर, वीज, पाणी अशा पायाभूत गोष्टी पुरविल्या पाहिजेत. मराठ्यांनी समाज म्हणून एकत्र यावे. स्नेहल दुर्गुळे म्हणाली, आता चर्चा, समिती थांबवून कृती करून क्रांतिकारी पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात. मुंबईचे पंकज घाग म्हणाले, मराठा समाजाने नोकरी न मागता नोकरी देणारे हात घडवायला हवेत. यासाठी फोरम निर्माण करून व्यवसाय-व्यापार, उद्योगामध्ये मराठा टक्का कसा वाढेल हे पाहिले पाहिजे. अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, आरक्षण मिळवायचे असेल तर त्यासाठी टोकाची लढाई करावी लागेल. न्यायालय म्हणते तुम्ही मागास आहात; त्याचे पुरावे सादर करा, पुरावे सादर करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्याची आहे. गायत्री राऊत म्हणाल्या,आम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर मूकपणे आलो; पण अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही.मराठा समाजातील घटक म्हणून येथे आलोय : संभाजीराजेहातात तलवार घेऊन लढणाऱ्या मराठ्याच्या अभूतपूर्व शिस्तीचे दर्शन मराठा क्रांती मोर्चाने दिले. खऱ्या अर्थाने मराठा समाजाची ताकद जगाला दिसली आहे. त्यामुळे आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. मी येथे मराठा समाजातील एक घटक म्हणून आलो असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.ते म्हणाले, समाजाने आपली प्रतिष्ठा, पद बाजूला ठेवून एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी चर्चा केली पाहिजे. शिक्षण, शेती, व्यवसायात मराठा समाजाची प्रगती कशाप्रकारे करता येईल याबाबत सविस्तर चर्चा केली पाहिजे. यासाठी सकल मराठा समाजाची जी काही भूमिका असेल, तीच माझी भूमिका असेल.आपण एकसंघ राहत नाही तोपर्यंत सरकार आपली दखल घेणार नाही. भक्कम, अभ्यासपूर्ण मुद्दे काढून सरकारसमोर मांडूया. समाजासाठी योगदान, वेळ देणाऱ्यांची एक समिती तयार करा. कोणत्याही नेत्याला घेऊन पुढे जाऊ नका. यश आपल्या हातात आहे. त्यासाठी आपली एकजूट कायम ठेवू.समितीचे पद लावणार नाहीमराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सरकारदरबारी पाठपुरावा या राज्यस्तरीय समन्वय समितीद्वारे केला जाईल, असे संजीव भोर-पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, समितीत जिल्हानिहाय प्रतिनिधी घेतले जातील. समिती अंतिम झाल्यानंतर त्याअंतर्गत प्रतिनिधींवर कृषी, अ‍ॅट्रॉसिटी, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रनिहाय अंतर्गत जबाबदारी निश्चित करण्यात येईल, हे प्रतिनिधी समितीचे पद लावणार नाही. परिषदेतील ठरावच्शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतीसाठी मोफत, अखंडित वीजपुरवठा करावा.च्सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे आयात-निर्यात धोरण राबवावे.च्शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.च्मराठा समाजातील उद्योजक बनविण्यासाठी जिल्हानिहाय सध्याच्या मराठा उद्योजकांनी गटाची स्थापना व्हावी.च्उद्योग हा विषय घेऊन पुन्हा एक परिषद घेऊन नवउद्योजकांना प्रशिक्षण द्यावे.च्सरकारी सोयीचा उपयोग करून कौशल्य विकास कार्यक्रमाला चालना देऊन त्याची केंद्रे सुरू व्हावीत.च्अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी त्यात सुधारणा करावी.च्‘सकल मराठा समाज’, ‘मराठा क्रांती’ या नावाने कोणीही व्यक्ती अथवा संघटनांनी वैयक्तिक कार्यक्रम राबवू नये.च्सीमाबांधवांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा आहे.च्छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा पुण्यातील संभाजी महाराज उद्यानामध्ये उभा करावा.च्मराठा क्रांती मोर्चाद्वारे अंतिमरित्या सरकारकडे करण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करावी.च्मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी राज्य सरकारने योग्य ती सर्व कार्यवाही पूर्ण करून कायदेशीर घटनात्मकदृष्ट्या वैध असे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत.च्मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करणे. त्यासाठी आचारसंहिता तयार केली जाईल. पुढील कार्यवाही ती समिती करेल.च्मराठा समाजातील महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे.च्रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केल्याच्या घटनेचा जाहीर निषेध.च्दि. १० मे आणि ३० मे रोजी कोणताही मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने जाहीर केलेला नाही. पुढील मोर्चा किंवा कृतीची घोषणा समन्वय समिती करेल.परिषदेतील सूरआता आपलीलढाई सुरूआरक्षण हा आता लाभाचा विषय राहिला नाही, तर तो अस्मितेचा बनला आहे. सरकारने मागील दोन वर्षांत काही केले नाही. मात्र, आंदोलनाचा आणि क्रांती मूक मोर्चाच्या धास्तीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याचे बाळासाहेब सराटे यांनी सांगितले. ते म्हणाले, आरक्षणाबद्दल सर्वांत मोठी उपलब्धी काय असेल तर प्रतिज्ञापत्र राज्य शासनाच्या सहीने न्यायालयात सादर केले आहे. आता आपली लढाई सुरू झाली आहे. हे प्रतिज्ञापत्र आयोगासमोर जाऊ द्या, त्याला तपासणी करू द्या. मग न्यायालयात मराठा समाज पात्र असल्याचे आपण दाखवून देऊ. आपण तयारी केली आहे. पुरावे तयार केले आहेत. राज्यातील शैक्षणिक आरक्षण हे बेकायदेशीर आहे, त्याचे कुठलेही कायदेशीर डॉक्युमेंटेशन नाही. शासनाकडे तसे कोणतीही नोंद नाही. या आरक्षणाविरोधात आवाज उठविला पाहिजे.कर्नाटकातील मराठा बांधवांचा सहभागया परिषदेत कर्नाटकातील बेळगाव येथून नेताजी जाधव, विलास बेळगावकर, एस. एम. बेळवडकर, सुनील जाधव, गुणवंत पाटील, आदी मराठा बांधव सहभागी झाले होते. सीमाबांधवांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा राहण्याचा ठराव परिषदेत झाल्यानंतर त्यांनी उभे राहून ‘एक मराठा लाख मराठा’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.राज्यभरातील प्रतिनिधींची उपस्थितीनामदेव कदम (रायगड), एम. एम. तांबे, एस. बी. पठारे (अहमदनगर), न. शा. जाधव (सोलापूर), महेश धुळप (कराड), अंकुश कदम (मुंबई), केदार कदम, धनंजय जाधव (पुणे), बालाजी मेढे (अंबेजोगाई), डॉ. राजाभाऊ करपे (औरंगाबाद), विनोद शिंदे (सातारा), विवेक पाटील (कराड), प्रकाश चौगुले (पिंपरी), योगेश सूर्यवंशी (सांगली), आदींसह राज्यभरातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते. परिषदेतील ठरावशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतीसाठी मोफत, अखंडित वीजपुरवठा करावा.सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे आयात-निर्यात धोरण राबवावे.शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.मराठा समाजातील उद्योजक बनविण्यासाठी जिल्हानिहाय सध्याच्या मराठा उद्योजकांनी गटाची स्थापना व्हावी.उद्योग हा विषय घेऊन पुन्हा एक परिषद घेऊन नवउद्योजकांना प्रशिक्षण द्यावे.सरकारी सोयीचा उपयोग करून कौशल्य विकास कार्यक्रमाला चालना देऊन त्याची केंद्रे सुरू व्हावीत.अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी त्यात सुधारणा करावी.‘सकल मराठा समाज’, ‘मराठा क्रांती’ या नावाने कोणीही व्यक्ती अथवा संघटनांनी वैयक्तिक कार्यक्रम राबवू नये.सीमाबांधवांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा पुण्यातील संभाजी महाराज उद्यानामध्ये उभा करावा.मराठा क्रांती मोर्चाद्वारे अंतिमरित्या सरकारकडे करण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करावी.मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी राज्य सरकारने योग्य ती सर्व कार्यवाही पूर्ण करून कायदेशीर घटनात्मकदृष्ट्या वैध असे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत.मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करणे. त्यासाठी आचारसंहिता तयार केली जाईल. पुढील कार्यवाही ती समिती करेल.मराठा समाजातील महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे.रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केल्याच्या घटनेचा जाहीर निषेध.दि. १० मे आणि ३० मे रोजी कोणताही मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने जाहीर केलेला नाही. पुढील मोर्चा किंवा कृतीची घोषणा समन्वय समिती करेल.