शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार : राजेश टोपे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 20:05 IST

आवश्यक लसींच्या उपलब्धतेसाठी सरकार योग्य ते पाठपुरावा करत राहील.

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 2 लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता लसीकरणासाठी लोक स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पण सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला आणखी चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी दिली आहे. 

एका पुरस्कार वितरण समारंभानिमित्त आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पुणे दौऱ्यावर ते आले होते. यावेळी ते बोलत होते. टोपे म्हणाले, लसीकरण करणाची मोहीम राबविताना लसींच्या संख्येत कमतरता होणार नाही. आता आरोग्याच्या दृष्टीने पुरेसा लसींचा साठा मिळाला आहे. तसेच पुढेही आवश्यक लसींच्या उपलब्धतेसाठी सरकार योग्य ते पाठपुरावा करत राहील. पण आरोग्यमंत्री म्हणून सांगतो आहे की, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी नावे नोंदवून घेतली पाहिजे. ३० कोटी लोकांना लसीकरण करणार आहोत. त्याचा टप्पाही लवकरात लवकर घेण्यात येईल. 

पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना राजेश टोपे म्हणाले, मागील वर्षभरात स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र कष्ट घेणाऱ्या कोरोना योद्ध्यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो. समृद्ध आरोग्य ही सामान्यांची खरी गरज आहे. आरोग्य विभागात सुधारणेला खूप वाव आहे. विभागाला कायम अपुरा निधी मिळतो. ६ टक्के तरतूद अपेक्षित असताना जीडीपीच्या केवळ १ टक्का तरतूद होते. कमी मनुष्यबळ, रिक्त जागा या आव्हानांचा सामना करत आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ता गाजवण्यासाठी नाही, गांजलेलल्यासाठी असते. प्रत्येकाला संतुष्ट करता आले नाही तरी चांगल्या हेतूने सेवा करता येते. समस्यांना पाठ दाखवली तर त्या पाठीशी लागतात. याउलट, खंबीरपणे सामोरे गेल्यास समस्या कमी होतात. कोरोना काळ हा नफेखोरीचा कालावधी नाही. त्यामुळे चाचण्या, मास्क, प्लझ्मा, इंजेक्शन यांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला. 

आरोग्य सेवा जवळ, परवडणारी आणि स्वीकारार्ह असली पाहिजे. सामान्य लोक लुबाडले जाऊ नयेत. नफेखोरांवर लगाम ठेवण्याचे काम शासनाचे असते. जनहिताचा रथ शासनाला अधिक गतीने पुढे घेऊन जायचा आहे. 

याचा अर्थ कुठे तरी चुकते आहे... ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रति आदर आहे. राज्य व देशासाठी त्यांनी चांगले काम आहे. जलसंधारण आणि इतर काम चांगले केली आहेत. मात्र कृषी कायद्यांच्या विरोधात ते आंदोलन करत आहेत. याचा अर्थ केंद्र सरकार कुठे तरी चुकत आहे. म्हणून आंदोलनाला महत्व आहे. मनधरणी केली जात आहे ही समाधानाची गोष्ट आहे. तसेच हजारे यांच्या तब्येतीसाठी हितावह आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेRajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या