रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने युपीएचा पराभव

By Admin | Updated: May 30, 2014 01:02 IST2014-05-30T01:02:03+5:302014-05-30T01:02:03+5:30

केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती. त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला पराभव झाला, असे मत

UPA's defeat due to non-promotion of creative work | रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने युपीएचा पराभव

रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने युपीएचा पराभव

मणिशंकर अय्यर  : आरोपावर वेळीच स्पष्टीकरण झाले नाही
नागपूर : केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती.   त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला  पराभव झाला, असे मत माजी केंद्रीय मंत्री खा. मणिशंकर अय्यर यांनी गुरुवारी व्यक्त केले. प्रदेश  काँग्रेसचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रामटेक येथे  आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, देशमुख यांच्या निवासस्थानी पत्रपरिषदेत ते बोलत होते.
युपीए सरकारने मनरेगा, राष्ट्रीय पेयजल, इंदिरा आवास, अन्नसुरक्षा अशा रचनात्मक योजना हाती  घेतल्या. विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात या योजना केंद्र शासनाने राबविल्याचा प्रचार  करण्यात आम्ही कमी पडलो. काँग्रेसच नव्हे तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, अकाली  लोकदल व नॅशनल कॉन्फरन्स अशा पक्षांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.  पक्षाच्या नेत्या  सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यामुळे किमान ४४ जागा तरी मिळाल्या नाही तर इतक्याही जागा  मिळाल्या नसत्या, असे अय्यर म्हणाले. पक्षाने उमेदवारांची नावे सहा महिन्यापूर्वीच जाहीर  करायला हवी होती. काही उमेदवारांची नावे उमेदवारी अर्ज भरण्याला काही तासाचा अवधी  शिल्लक असताना जाहीर करण्यात आली. घोटाळे झाले नसतानाही याचे वेळीच स्पष्टीकरण दिले  नाही. ज्यांना कोळशाचे कंत्राट मिळाले त्यात विरोधी पक्षाचेच लोक होते. मोदी सरकारचा देशाला  धोका असून आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही अनेकदा  काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे  यातून पक्ष लवकरच सावरेल, असा विश्‍वास अय्यर यांनी व्यक्त  केला. यावेळी रणजित देशमुख व डॉ. अमोल देशमुख उपस्थित होते.
एसआयटीने निवडणूक खर्चाचाही शोध घ्यावा
काळ्यय़ा पैशाचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने भाजपने निवडणुकीत  केलेल्या हजारो कोटींच्या खर्चाचाही शोध घ्यावा. (प्रतिनिधी)
 त्यांना परदेशातील बँकामध्ये ठेवलेल्या काळ्या पैशाचा शोध घेण्याची गरज भासणार नसल्याचे  मणिशंकर अय्यर म्हणाले. (प्रतिनिधी)
 

Web Title: UPA's defeat due to non-promotion of creative work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.