शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

कांदा व्यापाºयांच्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 20:25 IST

कांद्याचा सरासरी ९०० ते १५०० रूपये प्रति क्विंटल भाव पाहता हे नुकसान सुमारे सव्वाशे कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देरब्बी आणि उन्हाळ कांद्याची बाजारातील आवक सामान्यपणे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होतेसरकारच्या नवीन धोरणामुळे कांदा साठवणुकीवर मर्यादा आली केंद्र सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कांद्याचे भाव व अहवाल मागविला . कांद्याचा सरासरी ९०० ते १५०० रूपये प्रति क्विंटल भाव

नाशिक : आयकर विभागाच्या छाप्यामुळे बाजार समित्यांमधील कांदा व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिकच्या १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसाला सरासरी दीडशे ते दोनशे क्ंिवटल कांद्याची आवक होते. कांद्याचा सरासरी ९०० ते १५०० रूपये प्रति क्विंटल भाव पाहता हे नुकसान सुमारे सव्वाशे कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.आवक वाढल्याने आधीच कांद्याचे भाव एका महिन्यात तेराशे रुपयांनी घसरल्याचे चित्र होते. त्यात आता दोन दिवसांपासून संप सुरू असल्याने कांद्याचे भाव आणखी गडगडले आहेत. केंद्र सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कांद्याचे भाव व अहवाल मागविला आहे. मागील महिन्यात २८०० रुपयांपर्यंत क्विंटलला गेलेला भाव एका महिन्याभरातच आवक वाढल्याने चक्क १५०० रुपयापर्यंत गडगडला आहे. मागील महिन्यात कांद्याचे वाढलेले भाव हे कृत्रिम असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. इजिप्तच्या कांदा निर्यातीची भीती दाखवून कांदा उत्पादकांना एकाच वेळी कांदा बाजारात आणण्यास लावून कांद्याच्या भावात घसरण करण्याचे धोरण काही यंत्रणांकडून केले जात असल्याचा आरोप होतो आहे. त्यात धाडसत्रामुळे व्यापाºयांनी बाजार समित्यांना पत्र देऊन काही दिवसांसाठी लिलावात सहभागी होता येणार नाही, असे कारण दिले आहे. सरकारच्या नवीन धोरणामुळे कांदा साठवणुकीवर मर्यादा आली आहे. या मर्यादेमुळेच आता कांदा व्यापारी कांदा साठवणुकीस तयार नसून, त्यामुळे कांदा खरेदीही करण्यास नाखूश असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.रब्बी आणि उन्हाळ कांद्याची बाजारातील आवक सामान्यपणे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होत असते आणि त्याची साठवणूक केली जाते. साठा केलेला हाच कांदा दिवाळीपर्यंत बाजाराची गरज भागवीत असतो. हे गणित जेव्हा चुकते, तेव्हा ग्राहकपेठेत आगडोंब उसळतो. ग्राहकांना आणि खरे तर मतदारांना चढ्या भावात कांदा खरेदी करणे भाग पडू नये कारण तसे झाले तर ते आपल्या विरोधात जाऊ शकते, यासाठी केंद्राची सारी धडपड असली तरी त्याला भाव पातळी स्थिर राहण्याचे कारण दिले जाते आहे. आता दोन दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे कांदा उत्पादक वेठीस धरला जात आहे. कांदा उत्पादकांच्या अडवणुकीचे धोरण सरकारच्या धाडसत्राकडे अंगुलीनिर्देश दाखवून व्यापारी यंत्रणा काम करीत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये आहे.