शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

बेभरवशाच्या पावसाने खरीप क्षेत्र जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:31 PM

दर दोन-तीन वर्षांनंतर पाऊसमान बदलत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पेरणीचे क्षेत्रही कमी-अधिक होत असून, मागील वर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

सोलापूर : दर दोन-तीन वर्षांनंतर पाऊसमान बदलत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पेरणीचे क्षेत्रही कमी-अधिक होत असून, मागील वर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. तूर, उडीद, मका याशिवाय अलीकडे मराठवाड्याच्या लगतच्या क्षेत्रात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रातवाढ होत असली, तरी खरिपाच्या क्षेत्रात फार असा बदल होत नाही.सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी जिल्हा म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभऱ्याच्या पेरणीशिवाय ऊस लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रात आजही खरीप पेरणीवर शेतकरी भर देतात. यामध्ये अक्कलकोट, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा या तालुक्यात प्रामुख्याने खरीप पेरणी होते. सोलापूर जिल्ह्याचे खरीप पेरणीचे सरासरी क्षेत्र ७९ हजार १७ हेक्टर इतके आहे. जून-जुलै महिन्यात पाऊस जसा पडेल, त्या प्रमाणात खरीप पेरणीचे क्षेत्र कमी-अधिक होते. मागील वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने प्रत्यक्षात एक लाख ७ हजार ६७४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस पडला असला, तरी अनेक भागात अद्यापही पेरणीस उपयुक्त पाऊस झालेला नाही.ज्या भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागातही नंतर पाऊस लांबणार असल्याचे अंदाज सांगितल्याने पेरणी करण्यास शेतकरी धाडस करत नाहीय. जिल्ह्यातील शेतकरी जूनमध्ये चांगला पाऊस पडला, तर उडीद, मूग, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला, तर तूर व सोयाबीनवर भर देतो.