शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उन्हाळ्यात अवकाळी, पिकांची झाली माती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 09:37 IST

Unseasonal Rain In Maharashtra: विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे हळद, आंबा व फळबागांचे नुकसान झाले आहे.  

 नांदेड/गडचिरोली - विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे हळद, आंबा व फळबागांचे नुकसान झाले आहे.   

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. त्यामुळे शिजवून वाळू घातलेल्या हळदीचे अधिक नुकसान झाले. काढणीस आलेल्या हरभरा पिकाचेही नुकसान झाले आहे.  परभणीमध्येही शनिवारी रात्रीच्या वादळामुळे झाडे उन्मळून पडली. रब्बी हंगामातील काही पिकांचे नुकसान झाले. रविवारी सकाळपर्यंत परिसरात ४.२ मिलिमीटर पाऊस झाला. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातही वादळामुळे पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. 

वीज कोसळून दोन ठारबीड/सातारा : पाथरवाला बु. (ता. गेवराई, जि. बीड) येथील श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे (१८) हा युवक शनिवारी रात्री उसाला पाणी देत होता. यावेळी वीज तरुणाचा मृत्यू झाला. आलेवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील गणेश दुटाळ (३४) हा ज्वारी काढत असताना वीज कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र