शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'तत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:47 IST

महाविकास आघाडी सरकारबद्दल गडकरींची प्रतिक्रिया

मुंबई : हे सरकार पडावे की राहावे यावर मी बोलणार नाही पण जेव्हा जेव्हा अशी तत्त्वशून्य आघाडीची अनैतिक सरकारे आली ती फार काळ टिकली नाहीत हा इतिहास आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल येथे व्यक्त केले.एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रश्नोत्तराच्या सत्रात गडकरी म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती ही बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी अस्तित्वात आणली. ती सर्वात जास्त काळ टिकली कारण आमच्या विचारांमध्ये समानता होती. आज काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मूळ विचारातच तफावत आहे. त्यामुळे त्यांना कधी ना कधी अडचण ही येणार आहे. विचारसरणीपेक्षा जेव्हा सत्ता महत्त्वाची असते, तेव्हा विचारसरणी, तत्वे मागे पडतात आणि अशी अनैसर्गिक युती होते व ती काळाच्या ओघात टिकत नाही असा इतिहास आहे. महाविकास आघाडी सरकारचे काय होते ते बघू, असेही गडकरी म्हणाले. आंबेडकर, शाहू, फुलेंचा विचार मांडणारी काँग्रेस, राष्ट्रवादी कोणत्या विचाराने शिवसेनेबरोबर गेली हे मला समजत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.पण मनभेद नाहीतउद्धव ठाकरे यांचा मला मध्यंतरी फोन आला. तुम्ही माझ्यावर नाराज आहात का, असे त्यांनी विचारले. मी म्हणालो बिलकूल नाही. मतभेद झाले असतील पण मनभेद नाहीत. राज्याच्या हितासाठी मी नेहमीच मदतीची भावना ठेवली आहे. त्यात मी पक्षीय भेदाभेद करीत नाही, असा अनुभव सांगून गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये हीच आपली मनोकामना आहे आणि तो दिवस कोणाहीमुळे येणार असेल तर आपण त्याला मदतच करू.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे