शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

'तत्त्वशून्य आघाडीचे सरकार फार काळ टिकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:47 IST

महाविकास आघाडी सरकारबद्दल गडकरींची प्रतिक्रिया

मुंबई : हे सरकार पडावे की राहावे यावर मी बोलणार नाही पण जेव्हा जेव्हा अशी तत्त्वशून्य आघाडीची अनैतिक सरकारे आली ती फार काळ टिकली नाहीत हा इतिहास आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल येथे व्यक्त केले.एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रश्नोत्तराच्या सत्रात गडकरी म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती ही बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी अस्तित्वात आणली. ती सर्वात जास्त काळ टिकली कारण आमच्या विचारांमध्ये समानता होती. आज काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मूळ विचारातच तफावत आहे. त्यामुळे त्यांना कधी ना कधी अडचण ही येणार आहे. विचारसरणीपेक्षा जेव्हा सत्ता महत्त्वाची असते, तेव्हा विचारसरणी, तत्वे मागे पडतात आणि अशी अनैसर्गिक युती होते व ती काळाच्या ओघात टिकत नाही असा इतिहास आहे. महाविकास आघाडी सरकारचे काय होते ते बघू, असेही गडकरी म्हणाले. आंबेडकर, शाहू, फुलेंचा विचार मांडणारी काँग्रेस, राष्ट्रवादी कोणत्या विचाराने शिवसेनेबरोबर गेली हे मला समजत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.पण मनभेद नाहीतउद्धव ठाकरे यांचा मला मध्यंतरी फोन आला. तुम्ही माझ्यावर नाराज आहात का, असे त्यांनी विचारले. मी म्हणालो बिलकूल नाही. मतभेद झाले असतील पण मनभेद नाहीत. राज्याच्या हितासाठी मी नेहमीच मदतीची भावना ठेवली आहे. त्यात मी पक्षीय भेदाभेद करीत नाही, असा अनुभव सांगून गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये हीच आपली मनोकामना आहे आणि तो दिवस कोणाहीमुळे येणार असेल तर आपण त्याला मदतच करू.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे