शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

युजीसीच्या परीक्षेवरील नव्या सुचनांमुळे विद्यापीठे आली अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 01:50 IST

युजीसी रेग्युलेशन विद्यापीठांना बंधनकारक

ठळक मुद्दे राज्य शासनाचा निर्णयही डावलता येत नाही

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सुधारित सूचनांद्वारे राज्यातील विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत.तर राज्य शासनाने परीक्षा न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.त्यामुळे राज्यातील विद्यापीठे अडचणीत सापडली आहेत.उच्च शिक्षण हा विषय समवर्ती यादीत असल्याने केंद्र व राज्य शासनाला यावर कायदा घेण्याचे अधिकार आहेत.परंतु,एखाद्या मुद्यावर वाद निर्माण झाल्यास केंद्र शासनाचा निर्णय टिकतो व राज्याचा निर्णय रद्द होतो, असे विद्यापीठ कायद्याचे अभ्यासक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा नंदकुमार निकम यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

 राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत,असे पुन्हा स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण करण्याबाबत विद्यापीठांना निर्देश दिले आहेत.परंतु, राज्य शासन यूजीसीला डावलून या परिक्षेबाबत निर्णय घेऊ शकते का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

याबाबत विद्यापीठ कायद्याचे अभ्यासक व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा.नंदकुमार निकम म्हणाले, उच्च शिक्षण हा विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूची मध्ये येतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाला उच्च शिक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. तसेच विद्यापीठे ही राज्य शासनाच्या अखत्यारित असली तरी शैक्षणिक दृष्टया युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चालतात. यूजीसीने 2003 मध्ये प्रसिद्ध केलेले रेग्युलेशन सर्व विद्यापीठांनी पाळणे बंधनकारक आहे.परंतु, राज्य शासनाला यूजीसीची मार्गदर्शक तत्वे बंधनकारक आहेत किंवा नाहीत; हा भाग आता न्यायप्रविष्ट असून त्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

 विद्यापीठ अनुदान आयोगाने २९ एप्रिल व ६ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षा घेण्याच्या निर्णयावर सातत्य ठेवले आहे.मात्र, परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत यूजीसीकडून नियमावली दिली जात नाही. परंतु, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परीक्षा घेण्याबाबत काही सूचना दिल्या जात आहेत.या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाचे एकमत होत नाही व वाद निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी समवर्ती यादीतील मुद्यावर वाद निर्माण होतो. त्यावेळी केंद्र शासनाचा निर्णय न्यायालयात टिकतो. राज्य शासनाचा निर्णय टिकत नाही,हे मूळ सूत्र आहे, मात्र, युजीसीच्या मार्गदर्शक सूचना म्हणजे संसदीय कायदा नाही. तसेच विद्यापीठ हे राज्य शासनाने स्थापित व नियंत्रित केलेली असल्याने अशा परिस्थितीत राज्याचा निर्णयही विद्यापीठांना डावलता येत नाही,असेही निकम यांनी सांगितले.

-----------------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर राज्य विद्यापीठांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणांची अंमलबजावणी सूक्ष्म स्तरावर जाऊन करणे अपेक्षित आहे.येथे 2003 च्या युजीसी रेग्युलेशनचा विचार करावा लागतो.मात्र, विद्यापीठांना राज्य शासनाचा निर्णय डावलता येत नाही.त्यामुळे सध्या राज्य विद्यापीठे अडचणीत आली आहेत.

- प्रा. नंदकुमार निकम, विद्यापीठ कायद्याचे अभ्यासक व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ 

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठEducationशिक्षण