शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Maharashtra Politics: “निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊतांना नेमायचे का? २ हजार कोटींबद्दल त्यांनाच विचारा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 22:37 IST

Maharashtra News: लोकशाहीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पक्षातील निवडणुका घेतल्या नाहीत. तेच खरे हुकुमशाह आहेत, असा पलटवार रावसाहेब दानवेंनी केला.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर यासंदर्भात राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. चिंचवड येथे प्रचारासाठी आलेल्या दानवे यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले. 

२०२४ ची निवडणूक शेवटची ठरू शकते. देशात हुकुमशाही लागू शकते, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे काय बोलतात आणि त्यांचा बोलविता धनी कोण आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा देश लोकशाहीला मानणारा आहे. लोकशाहीविरोधात जो पक्ष काम करेल, त्यांना जनता जागा दाखवून देईल. लोकशाहीप्रमाणे यांनी कधी पक्षाच्या निवडणुका घेतल्या नाहीत. लोकांना काय लोकशाही दाखवतात, खरे हुकुमशाह हे आहेत. उद्धव ठाकरे नैराश्यातून अशी विधाने करत आहेत, असा पलटवार दानवे यांनी केला.  

निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊतांना नेमायचे का?

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून, निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आले असता, निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊत यांना नेमायचे का, असा खोचक सवाल दानवे यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी २ हजार कोटींच्या दाव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, संजय राऊत ठाम असले तरी न्यायालयात काय तो निर्णय होईल. २ हजार कोटी आले कुठून, दिले कोणाला, कोटींचा दावा त्यांनाच माहिती आहे, भाजपने अशा प्रकारचे व्यवहार कधीही केलेले नाहीत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप निवडून येतील. लक्ष्मण जगताप यांनी खूप काम केले आहे. जनतेचा विश्वास भाजपवर आहे. सर्वांत जास्त मते अश्विनी जगताप यांना मिळतील. देशात आणि राज्यात भाजपच्या बाजूने वातावरण आहे, असे रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे