शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊतांना नेमायचे का? २ हजार कोटींबद्दल त्यांनाच विचारा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 22:37 IST

Maharashtra News: लोकशाहीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पक्षातील निवडणुका घेतल्या नाहीत. तेच खरे हुकुमशाह आहेत, असा पलटवार रावसाहेब दानवेंनी केला.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर यासंदर्भात राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. चिंचवड येथे प्रचारासाठी आलेल्या दानवे यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले. 

२०२४ ची निवडणूक शेवटची ठरू शकते. देशात हुकुमशाही लागू शकते, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे काय बोलतात आणि त्यांचा बोलविता धनी कोण आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा देश लोकशाहीला मानणारा आहे. लोकशाहीविरोधात जो पक्ष काम करेल, त्यांना जनता जागा दाखवून देईल. लोकशाहीप्रमाणे यांनी कधी पक्षाच्या निवडणुका घेतल्या नाहीत. लोकांना काय लोकशाही दाखवतात, खरे हुकुमशाह हे आहेत. उद्धव ठाकरे नैराश्यातून अशी विधाने करत आहेत, असा पलटवार दानवे यांनी केला.  

निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊतांना नेमायचे का?

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून, निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आले असता, निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊत यांना नेमायचे का, असा खोचक सवाल दानवे यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी २ हजार कोटींच्या दाव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, संजय राऊत ठाम असले तरी न्यायालयात काय तो निर्णय होईल. २ हजार कोटी आले कुठून, दिले कोणाला, कोटींचा दावा त्यांनाच माहिती आहे, भाजपने अशा प्रकारचे व्यवहार कधीही केलेले नाहीत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप निवडून येतील. लक्ष्मण जगताप यांनी खूप काम केले आहे. जनतेचा विश्वास भाजपवर आहे. सर्वांत जास्त मते अश्विनी जगताप यांना मिळतील. देशात आणि राज्यात भाजपच्या बाजूने वातावरण आहे, असे रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे