शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 14:49 IST

Ramdas Athawale News: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे रामदास आठवले यांनी मागण्यांची यादी दिली असून, राज्यात महायुतीला १६० जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Ramdas Athawale News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपाकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक आठवड्यापूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना २० ते २१ जागांची यादी सोपवली आहे. त्यापैकी किमान ८ ते १० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. जागा किती लढणार याची संख्या कमी जास्त होऊ शकते. मात्र, राज्यातील सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून जे १२ आमदार विधानपरिषदेवर पाठवले जातात. त्यापैकी एक जागा आरपीआयला मिळावी. याशिवाय २ ते ३ महामंडळे मिळाली पाहिजेत, अशी विविध मागण्यांची यादी रामदास आठवले यांनी ठेवल्याचे सांगितले जात आहे. 

राज्यात महायुतीला १६० जागा मिळतील

लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण आता राज्यात नाही. आरपीआय आठवले गट महायुतीसोबत राहणार आहे. राज्यात महायुतीला १६० जागा मिळतील. लोकसभेला जे नुकसान झाले ते न होता विधानसभेला फायदा मिळेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तर, लाडकी बहीण योजनेचा प्रभाव या निवडणुकीत दिसू शकेल, असे आठवले यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात होऊ घालत असलेल्या तिसऱ्या आघाडीबाबत रामदास आठवले यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. 

दरम्यान, बच्चू कडू यांनी आमच्यासोबत राहायला हवे. आम्ही तिसऱ्या आघाडीत जाणार नाही. कारण त्या आघाडीचा काहीच उपयोग नाही. एकट्याने लढल्यावर विजय शक्य नसतो. त्यासाठी तुमच्याकडे आघाडी असेल तर तुम्ही जास्त यशस्वी ठराल. आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्या आघाडीचा विजय निश्चित असतो, असे रामदास आठवले म्हणाले.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती