शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राऊतांच्या इशाऱ्यानंतर नारायण राणेंचं खुलं आव्हान; आज तर आजच, उद्या म्हणाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 12:55 IST

राज्याच्या विकासाबाबत काय बोलतात? तोंडाला येईल ते बोलतात. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे अशी टीका राणेंनी राऊतांवर केली.

मुंबई - तू कोणाला चॅलेंज देतोय? संजय राऊतांनी केलेले एक तरी धार्मिक, सामाजिक, धोरणात्मक कार्य केलंय ते दाखवा. एकटा फिरा. मला संरक्षण मी मागितलेले नाही. ९० सालापासून संरक्षण आहे. मी शिवसेना वाढीसाठी ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्यापासून संरक्षण आहे. राऊत तू जिथे बोलशील तिथे यायला तयार, संरक्षण मी इथेच सोडतो. बघूया असं प्रतिआव्हान नारायण राणेंनी संजय राऊतांना दिले आहे. 

नारायण राणे म्हणाले की, माध्यमाला केवळ संजय राऊत हवेत. त्याची विकृती लोकांना दाखवण्याचं काम माध्यम करतेय हे योग्य नाही. शिवसेनेच्या पहिल्या ३९ वर्षात पक्ष वाढवण्यासाठी आणि सर्वकाही करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली नाही. संजय राऊतांनी घेतलीय. आज जो आनंद राऊतांना होतोय तो शिवसेना संपवल्याचा. ५६ आमदारांपैकी आता १२ आमदार उरलेत अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. 

तसेच हे राज्य शिवकल्याणकारी व्हावं. या राज्यात येणारा उद्योगपती, नागरीक सुरक्षित राहो. जनतेला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी आमचं सरकार काम करतेय. त्यांचे काम, कार्य दाखवा. सकाळी उठल्यापासून केवळ टीका. संजय राऊत लोकांच्या हिताचं काय बोलतात? राज्याच्या विकासाबाबत काय बोलतात? तोंडाला येईल ते बोलतात. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे. काही काम त्याच्याकडे नाही. शिव्या घालण्यापलीकडे काही नाही अशी खिल्ली राणेंनी राऊतांची उडवली आहे. 

मी उद्धव ठाकरेंना भेटणार अन्...

दरम्यान, मी केंद्रीय मंत्री आहे. मी अख्ख्या राज्यात फिरतो. उद्योग आणि रोजगार वाढवण्यासाठी काम करतो. मी उद्धव ठाकरेंना एक ना एक दिवस भेटणार. मी खासदार झाल्यानंतर माझ्याबाजूला संजय राऊत येऊन बसायचा आणि त्यावेळी राऊत उद्धव-रश्मी ठाकरेंबाबत जे काही सांगायचा ते उद्धव ठाकरेंना सांगणार. चपलेने नाही मारले तर मला विचारा. हा शिवसेना वाढवणारा नाही तर संपवणारा आहे. मातोश्रीला सुरुंग लावणारा विष आहे. तो ज्याच्या अंगावर, खांद्यावर हात टाकेल तो खांदा गळलाच समजा. हा विषारी प्राणी आहे. 

त्यामुळे मला परत संजय राऊतांबाबत विचारू नका. एकदिवस तरी संरक्षण सोडून मी संजय राऊतांसमोर जाणार. माझा इतिहास शिवसेना घडवण्यामध्ये आहे शिवसेना संपवण्यामध्ये नाही. माझ्या वाटेला येऊ नको. आज तर आज, उद्या म्हणाल तर मी उद्या त्रिपुराला आहे. राज्याच्या विकासाबद्दल बोला, लोकांच्या रोजीरोटीबद्दल बोला. बेरोजगारी घालवण्यासाठी काम करूया. मागील ८ वर्षात मोदी सरकारने ३० योजना लोकांपर्यंत पोहचवलेल्या. गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आणली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर किती शिवसैनिकांचे संसार या शिवसेनेने घडवले आणि उद्ध्वस्त केले हे जाहीर करा असं आवाहनही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना