शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

राऊतांच्या इशाऱ्यानंतर नारायण राणेंचं खुलं आव्हान; आज तर आजच, उद्या म्हणाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 12:55 IST

राज्याच्या विकासाबाबत काय बोलतात? तोंडाला येईल ते बोलतात. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे अशी टीका राणेंनी राऊतांवर केली.

मुंबई - तू कोणाला चॅलेंज देतोय? संजय राऊतांनी केलेले एक तरी धार्मिक, सामाजिक, धोरणात्मक कार्य केलंय ते दाखवा. एकटा फिरा. मला संरक्षण मी मागितलेले नाही. ९० सालापासून संरक्षण आहे. मी शिवसेना वाढीसाठी ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्यापासून संरक्षण आहे. राऊत तू जिथे बोलशील तिथे यायला तयार, संरक्षण मी इथेच सोडतो. बघूया असं प्रतिआव्हान नारायण राणेंनी संजय राऊतांना दिले आहे. 

नारायण राणे म्हणाले की, माध्यमाला केवळ संजय राऊत हवेत. त्याची विकृती लोकांना दाखवण्याचं काम माध्यम करतेय हे योग्य नाही. शिवसेनेच्या पहिल्या ३९ वर्षात पक्ष वाढवण्यासाठी आणि सर्वकाही करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली नाही. संजय राऊतांनी घेतलीय. आज जो आनंद राऊतांना होतोय तो शिवसेना संपवल्याचा. ५६ आमदारांपैकी आता १२ आमदार उरलेत अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. 

तसेच हे राज्य शिवकल्याणकारी व्हावं. या राज्यात येणारा उद्योगपती, नागरीक सुरक्षित राहो. जनतेला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी आमचं सरकार काम करतेय. त्यांचे काम, कार्य दाखवा. सकाळी उठल्यापासून केवळ टीका. संजय राऊत लोकांच्या हिताचं काय बोलतात? राज्याच्या विकासाबाबत काय बोलतात? तोंडाला येईल ते बोलतात. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे. काही काम त्याच्याकडे नाही. शिव्या घालण्यापलीकडे काही नाही अशी खिल्ली राणेंनी राऊतांची उडवली आहे. 

मी उद्धव ठाकरेंना भेटणार अन्...

दरम्यान, मी केंद्रीय मंत्री आहे. मी अख्ख्या राज्यात फिरतो. उद्योग आणि रोजगार वाढवण्यासाठी काम करतो. मी उद्धव ठाकरेंना एक ना एक दिवस भेटणार. मी खासदार झाल्यानंतर माझ्याबाजूला संजय राऊत येऊन बसायचा आणि त्यावेळी राऊत उद्धव-रश्मी ठाकरेंबाबत जे काही सांगायचा ते उद्धव ठाकरेंना सांगणार. चपलेने नाही मारले तर मला विचारा. हा शिवसेना वाढवणारा नाही तर संपवणारा आहे. मातोश्रीला सुरुंग लावणारा विष आहे. तो ज्याच्या अंगावर, खांद्यावर हात टाकेल तो खांदा गळलाच समजा. हा विषारी प्राणी आहे. 

त्यामुळे मला परत संजय राऊतांबाबत विचारू नका. एकदिवस तरी संरक्षण सोडून मी संजय राऊतांसमोर जाणार. माझा इतिहास शिवसेना घडवण्यामध्ये आहे शिवसेना संपवण्यामध्ये नाही. माझ्या वाटेला येऊ नको. आज तर आज, उद्या म्हणाल तर मी उद्या त्रिपुराला आहे. राज्याच्या विकासाबद्दल बोला, लोकांच्या रोजीरोटीबद्दल बोला. बेरोजगारी घालवण्यासाठी काम करूया. मागील ८ वर्षात मोदी सरकारने ३० योजना लोकांपर्यंत पोहचवलेल्या. गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आणली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर किती शिवसैनिकांचे संसार या शिवसेनेने घडवले आणि उद्ध्वस्त केले हे जाहीर करा असं आवाहनही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना