शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

गणवेश, शालेय साहित्य डीबीटीतून वगळले! पुरवठादारांचं चांगभलं, पण स्वागताचेही सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:26 IST

या निर्णयाचे आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुरवठ्याची व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असावी अशी मागणी समोर आली आहे. 

मुंबई : आदिवासी विकास खात्याने सोमवारी घेतलेला एक निर्णय पुरवठादार/कंत्राटदारांच्या पथ्यावर पडणार आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये आतापर्यंत गणवेश व शालेय साहित्यासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (डीबीटी) देण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद करून आता हे साहित्य विद्यार्थ्यांना पुरविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयाचे आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुरवठ्याची व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असावी अशी मागणी समोर आली आहे. 

वस्तू पुरवठ्याचा पूर्वानुभव लक्षात घेता वैयक्तिक वापरासाठीच्या वस्तूंसाठीचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकला जातो. या प्रक्रियेतून गणवेश संच, नाइट ड्रेस, शालेय साहित्य व लेखनसामग्री या बाबी वगळण्यात येत असल्याचे सोमवारच्या शासन निर्णयात म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हे साहित्य पुरविण्याऐवजी डीबीटीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुरवठादारांचे धाबे दणाणले. पुरवठादारांच्या लॉबीने हा निर्णय मागे घेण्यासाठी जंग, जंग पछाडले पण फडणवीस यांनी दाद दिली नव्हती. 

आता वस्तूच पुरवणार -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी योजनांचा लाभ डीबीटीमार्फत करण्याचे धोरण आधीपासूनच स्वीकारले आहे. काही वस्तू डीबीटीतून वगळाव्यात ही शिक्षण विभागाने केलेली विनंती वित्त विभागाने आधीच मान्य केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये के. सी. पाडवी आदिवासी विकासमंत्री असताना त्यांनी डीबीटी की वस्तूपुरवठा याबाबतचा निर्णय घेण्यासाठी माजी मंत्री पद्माकर वळवी यांची एक समिती नेमली होती. त्या समितीनेही डीबीटीऐवजी वस्तूपुरवठा करण्याची शिफारस केली होती. 

डीबीटीपेक्षा वस्तू पुरविणे हा निर्णय अधिक योग्य आहे. पुरवठ्यात गडबडी होतात म्हणून डीबीटी आणले खरे पण ते आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले होते. - विवेक पंडित, माजी आमदार डीबीटी बंद करून शालेय वस्तू पुरविण्याच्या निर्णयाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. वस्तू पुरवताना त्यांचा दर्जा राखला जावा, पुरवठ्याची व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असावी हे सरकारने बघितलेच पाहिजे.- प्रतिभा शिंदे, अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चाअत्यंत विचारांती हा निर्णय घेतला आहे. आम्ही पैसा द्यायचो मात्र तो भलतीकडेच खर्च व्हायचा. आता विद्यार्थ्यांना गणवेश आदी पुरवताना भ्रष्टाचार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. पुरवठादारांवर विभागाचा पूर्ण वॉच असेल. - डॉ. विजयकुमार गावित, मंत्री, आदिवासी विकास 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीSchoolशाळा