शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

वंचित बहुजन आघाडीत 'या' ठिकाणी हवी एमआयएमला उमदेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 15:18 IST

औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सगळेच राजकीय पक्ष जोरात कामाला लागले आहे. त्यात या निवडणूकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच खासदारकी जिंकणार एमआयएम सुद्धा रिंगणात उतरलं आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत ही वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढताना एमआयएमनं १०० जागांची मागणी केली आहे. यात औरंगाबादेत,बीड,परभणी आणि नांदेडसह मुस्लिम बहूल भागात एमआयएमनं उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे. त्यासाठी एमआयएनं एक यादीही आंबेडकरांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात औरंगाबादेत,बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, ठाणे, मुंबईतल्या काही जागा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही मुस्लिम बहूल भागातील काही मतदारसंघाचा समावेश आहे. तर एकट्या औरंगाबाद जिल्हात ४ जागांची मागणी एमआयएमने केली आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे विरोधकांचा मोठ नुकसान झाले. खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे. वंचितला एकगठ्ठा मुस्लीम आणि दलित मते मिळाल्याने महाआघाडीच्या मतांमध्ये फुट पडली. त्यामुळे मुस्लिम दलित मतं एका ठिकाणी आली तर काय होवू शकते याची प्रचिती मात्र या निवडणूकीत आली, त्यानुसार एमआयएमनं आता मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

तर यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एमआयएम विधानसभेला १०० जागा लढवणार आहे, अशी चर्चा असली तरी अद्याप तसे ठरलेले नाही. माझी व खासदार असदुद्दीन ओवेसी यांची दिल्लीत बैठक झाली. त्यात उमेदवार जिंकण्याच्या शक्यता हा निकष लावून जागावाटप करायचे ठरले आहे.