शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडीत 'या' ठिकाणी हवी एमआयएमला उमदेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 15:18 IST

औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सगळेच राजकीय पक्ष जोरात कामाला लागले आहे. त्यात या निवडणूकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच खासदारकी जिंकणार एमआयएम सुद्धा रिंगणात उतरलं आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत ही वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढताना एमआयएमनं १०० जागांची मागणी केली आहे. यात औरंगाबादेत,बीड,परभणी आणि नांदेडसह मुस्लिम बहूल भागात एमआयएमनं उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे. त्यासाठी एमआयएनं एक यादीही आंबेडकरांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात औरंगाबादेत,बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, ठाणे, मुंबईतल्या काही जागा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही मुस्लिम बहूल भागातील काही मतदारसंघाचा समावेश आहे. तर एकट्या औरंगाबाद जिल्हात ४ जागांची मागणी एमआयएमने केली आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे विरोधकांचा मोठ नुकसान झाले. खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे. वंचितला एकगठ्ठा मुस्लीम आणि दलित मते मिळाल्याने महाआघाडीच्या मतांमध्ये फुट पडली. त्यामुळे मुस्लिम दलित मतं एका ठिकाणी आली तर काय होवू शकते याची प्रचिती मात्र या निवडणूकीत आली, त्यानुसार एमआयएमनं आता मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

तर यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एमआयएम विधानसभेला १०० जागा लढवणार आहे, अशी चर्चा असली तरी अद्याप तसे ठरलेले नाही. माझी व खासदार असदुद्दीन ओवेसी यांची दिल्लीत बैठक झाली. त्यात उमेदवार जिंकण्याच्या शक्यता हा निकष लावून जागावाटप करायचे ठरले आहे.