शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

उल्हासनगरवासीयांना पुन्हा विस्थापित होऊ देणार नाही; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 19:38 IST

Jitendra Awhad Ulhasnagar : पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे संकेत.  

ठळक मुद्देपुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे संकेत.  

उल्हासनगर : शहरात अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असून शहरवासीयांना विस्थापित होऊ देणार नसल्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढू असे संकेत दिले.

उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेल्याच्या पाश्वभूमीवर १० वर्ष जुन्या १५०० पेक्षा जास्त इमारतीला स्ट्रॅक्टरल नोटीसा दिल्याने, धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला. तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून धोकादायक यादीतील ११६ इमारतीचे पाणी व वीज पुरवठा खंडित करून काही इमारतीवर तोडू कारवाई सुरू केल्याने, शहरात संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. उल्हासनगर ट्रेड असोसिएशन व धोकादायक इमारती मधील रहिवाशांनी इमारतीच्या पुनर्बांधणी साठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे साकडे घातले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी पक्षाची जिल्हाध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे शहरवासीयांच्या समस्या ऐकण्यासाठी शहरातील ईगल हॉटेलमध्ये आले होते. 

यावेळी नागरिकांनी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी वाढीव ४ चटईक्षेत्र, जमीन मालकीहक्क, इमारत नियमित करणे, सन २००६ चा रेडी रेकनार दर लावणे, भिवंडी आमंत्रण मध्ये ५०० प्लॉट देणे, इमारतीचे वीज व पाणी पुरवठा खंडित न करणे, इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत देणे आदी मागण्या करण्यात आल्या. शहरातील धोकादायक व अवैध इमारतींचा प्रश्न उभा ठाकला असून नागरिकांना विस्थापित होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देऊन याबाबत १५ दिवसात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व संबंधितांना सोबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. 

यातून मार्ग काढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यावेळी माजी महापौर हरदास माखीजा, पंचम कलानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, नगरसेवक मनोज लासी आदी उपस्थित होते. पालकमंत्री व नगरविकास मंत्री यांनी गेल्या आठवड्यात शहरातील अवैध व धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. मात्र ऐन वेळी बैठक रद्द केल्याने, शहरवासीयांकडून टीका होत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शहरवासीयांना दिलासा देतील. अशी आशा यावेळी बहुतांश नागरिकांनी व्यक्त केली. 

आयुक्त दयानिधी बाबत नाराजीकायम महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशाने १० वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट नोटीसा दिल्याने, शहरवासीयांवर विस्थापित होण्याची वेळ आल्याची टीका नागरिकांनी केली. हजारो नागरिकांवर विस्थापितांची वेळ आणल्याबद्दल अशा आयुक्तांची उचलबांगडी करण्याची मागणी करून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडulhasnagarउल्हासनगरMaharashtraमहाराष्ट्रHomeघर