शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

उल्हासनगरवासीयांना पुन्हा विस्थापित होऊ देणार नाही; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 19:38 IST

Jitendra Awhad Ulhasnagar : पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे संकेत.  

ठळक मुद्देपुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे संकेत.  

उल्हासनगर : शहरात अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला असून शहरवासीयांना विस्थापित होऊ देणार नसल्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढू असे संकेत दिले.

उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेल्याच्या पाश्वभूमीवर १० वर्ष जुन्या १५०० पेक्षा जास्त इमारतीला स्ट्रॅक्टरल नोटीसा दिल्याने, धोकादायक इमारतीचा प्रश्न उभा ठाकला. तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून धोकादायक यादीतील ११६ इमारतीचे पाणी व वीज पुरवठा खंडित करून काही इमारतीवर तोडू कारवाई सुरू केल्याने, शहरात संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. उल्हासनगर ट्रेड असोसिएशन व धोकादायक इमारती मधील रहिवाशांनी इमारतीच्या पुनर्बांधणी साठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे साकडे घातले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी पक्षाची जिल्हाध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे शहरवासीयांच्या समस्या ऐकण्यासाठी शहरातील ईगल हॉटेलमध्ये आले होते. 

यावेळी नागरिकांनी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी वाढीव ४ चटईक्षेत्र, जमीन मालकीहक्क, इमारत नियमित करणे, सन २००६ चा रेडी रेकनार दर लावणे, भिवंडी आमंत्रण मध्ये ५०० प्लॉट देणे, इमारतीचे वीज व पाणी पुरवठा खंडित न करणे, इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत देणे आदी मागण्या करण्यात आल्या. शहरातील धोकादायक व अवैध इमारतींचा प्रश्न उभा ठाकला असून नागरिकांना विस्थापित होऊ देणार नाही, असे आश्वासन यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी देऊन याबाबत १५ दिवसात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व संबंधितांना सोबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. 

यातून मार्ग काढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यावेळी माजी महापौर हरदास माखीजा, पंचम कलानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, नगरसेवक मनोज लासी आदी उपस्थित होते. पालकमंत्री व नगरविकास मंत्री यांनी गेल्या आठवड्यात शहरातील अवैध व धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. मात्र ऐन वेळी बैठक रद्द केल्याने, शहरवासीयांकडून टीका होत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शहरवासीयांना दिलासा देतील. अशी आशा यावेळी बहुतांश नागरिकांनी व्यक्त केली. 

आयुक्त दयानिधी बाबत नाराजीकायम महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशाने १० वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिट नोटीसा दिल्याने, शहरवासीयांवर विस्थापित होण्याची वेळ आल्याची टीका नागरिकांनी केली. हजारो नागरिकांवर विस्थापितांची वेळ आणल्याबद्दल अशा आयुक्तांची उचलबांगडी करण्याची मागणी करून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडulhasnagarउल्हासनगरMaharashtraमहाराष्ट्रHomeघर