शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उजनी धरण पोहोचले प्लस ३३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:58 IST

आनंदाची बातमी; १२ दिवसांत जमा झाला ५८ टक्के पाणीसाठा

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, जिरायत भागात पावसाशिवाय पर्याय नाहीनीरा नदीमध्ये सोडलेल्या पाण्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला उजनीत झपाट्याने पाणी वाढ झाल्यामुळे उजनी जलाशय परिसरात व नदीकाठच्या गावांमध्ये शेती मशागतीची लगबग सुरू

भीमानगर : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर भीमा खोºयात बुधवारी, गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्याने उजनी धरणात येणारा विसर्ग घटला होता. परंतु शुक्रवारी पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने विसर्ग वाढला असून उजनीची टक्केवारी आता मंद गतीने वाढताना दिसून येत आहे. उजनी धरण ३३ टक्के झाले असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती व उद्योग क्षेत्राला ऊर्जा मिळाली आहे.

दरम्यान, आॅगस्ट महिन्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असून यामुळे उजनी धरण भरण्याची आशा पल्लवित झाली आहे. मायनस ५९.८८ वरून आज उजनी धरण प्लस ३३ टक्के झाले आहे. २० जुलै रोजी धरणात वजा २८ टक्के पाणीसाठा होता. १२ दिवसात ५८ टक्के पाणी धरणात आले.

परंतु अद्यापही सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, जिरायत भागात पावसाशिवाय पर्याय नाही. नीरा नदीमध्ये सोडलेल्या पाण्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला असून यामुळे सोलापूर जिल्ह्याला भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. उजनीत झपाट्याने पाणी वाढ झाल्यामुळे उजनी जलाशय परिसरात व नदीकाठच्या गावांमध्ये शेती मशागतीची लगबग सुरू झाली आहे. हा भाग ऊस क्षेत्राचा पट्टा म्हणून ओळखला जातो.

दरम्यान, उजनीची सद्यस्थिती एकूण पाणीपातळी ४९३.३१० मीटर, एकूण पाणीसाठा २३०३.६० दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ५००.७० दलघमी अन् टक्केवारी प्लस ३३.०१ वर गेली आहे. सद्यस्थितीला दौंडमधून ४०५१० क्युसेक विसर्ग असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक