शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते; शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 16:00 IST

नवाब मलिकांशी मैत्री केल्यानंतर शिवसेना गणपती विसरली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर गोविंदा साजरा करण्यासही विसरली असा टोला शेलारांनी शिवसेनेला लगावला.

मुंबई - महाराष्ट्रात हिंदु सण साजरेच होणार नाही असं चित्र मागील महाविकास आघाडी सरकार काळात होते. कारण देशात कोरोना काळातही जगन्नाथ रथयात्रेपासून गंगेकिनाऱ्यापर्यंत यात्रा, उत्सव साजरे होत होते. परंतु उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते. मात्र आता सरकार बदललं असून हिंदु सण मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. मराठी माणसं जल्लोषात सहभागी होत आहेत असं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं. 

आशिष शेलार यांनी सांगितले की, प्रत्येक विषयाला निवडणुकीचं राजकारण करत नाही. मुंबईकरांचं स्वप्न आपलं मानून भाजपा काम करतेय. आज शहरात ३७० ठिकाणी भाजपाकडून दहिहंडीचा उत्सव साजरा करत आहे. घाटकोपरमध्ये आमदार राम कदम दरवर्षीप्रमाणे इथे दहिहंडी साजरी होतेय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर आधारित ही दहिहंडी आहे. मुंबईकर जनता ही भारतीय जनतासोबत आहे असं ते म्हणाले. 

त्याचसोबत नवाब मलिकांशी मैत्री केल्यानंतर शिवसेना गणपती विसरली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर गोविंदा साजरा करण्यासही विसरली. शिवसेनेच्या डोक्यात केवळ एक कुटुंब सोडून काहीच नाही. मुंबईकरांनी शिवसेनेला सोडलं आहे आणि भाजपाला जवळ केलंय. आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना निर्बंध घातले गेले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली. परंतु आज सरकार बदललं आणि तरुणाईचा उत्साह, हिंदु सणाचा उत्साह पुन्हा पाहायला मिळतोय असंही आशिष शेलारांनी सांगितले. 

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची हंडी फोडणारचदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडायला सुरुवात झाली आहे. आता आम्ही मुंबई महापालिकेतही भ्रष्टाचाराची हंडी फोडणारच आणि विकासरुपी मलाई आहे ती गरिबांपर्यंत घेऊन जाण्याचं काम करणार आहोत असं सांगत वरळीतील जांबोरी मैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. भाजपा मुंबईकडून जांबोरी मैदानात दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला. त्याला फडणवीसांनी हजेरी लावली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलार