शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीत पहिलं यश; कार्यकर्त्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 11:56 IST

सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला आहे.

सोलापूर - राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर सेनेचे तब्बल ५५ पैकी ४० आमदार आणि १२ खासदार फुटून शिंदे गटात सहभागी झाले. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील सत्तेतून पायउतार झालेल्या उद्धव ठाकरे यांना सोलापूरच्या निवडणुकीच्या निकालाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ७ सदस्य असलेल्या चिंचपूर ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाला जोरदार यश मिळालं असून ७ पैकी ७ सदस्य ठाकरे गटाचे निवडून आले आहेत. 

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र चिचंपूरमधील ग्रामपंचायतीच्या निकालाने उद्धव ठाकरे गटाने बाजी मारत भाजपाला चितपट केले आहे. राज्यात आज १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार असून या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीच्या निकालात स्थानिक पातळीवरील राजकारण असले तरी त्यातून जनमाणसाचा कानोसा घेतला जातो. चिंचपूरच्या निकालानंतर आता उर्वरित ग्रामपंचायीत कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्व राजकीय पक्षांना लागली आहे. 

शिवसेनेत एकनाथ शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे गटशिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडत शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार बाजूला केले परंतु आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन वाटचाल करतोय. आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांनी पाठिंबा दर्शवत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यात शिवसेनेत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशी फूट पडल्याचं दिसून येते. त्यामुळे चिंचपूरच्या ग्रामपंचायत निकालाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा