शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

"ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत" उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 19:54 IST

"ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचार सरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे."

मुंबई - ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचार सरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तेथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मदी सरकारवर हल्ला चढवला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबुजी) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या 'जवाहर' या चरित्र ग्रंथाचे मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी, राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राजेंद्र दर्डा, विजय दर्डा तथा प्रल्हाद पै हे व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, बाबूजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तुरुंगवास भोगला. पुढे काय होणार? शाळेत कसे जाणार, कॉलेजमध्ये काय होणार? याचा नव्हे, तर देश माझा स्वतंत्र झाला पाहीजे, हा विचार होता. अशा असंख्य लोकांनी आपापल्या परीने त्याग केला, सोसलं, भोगलं म्हणून आपण आज सुखाने राहू शकतो. मात्र, आताच्या या राजकारणात माला सांगावसे वाटते की, ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचारसरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे. मग त्यावेळी बाबूजींनी जे केले, त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात आणायला हव्या. 

अगदी काँग्रेसच्या वाईट काळात इंदिरा गांधींसोबत उभे राहणे, ही काही गमतीची गोष्ट नव्हती संपूर्ण जग विरोधात होते. अनेक जण सांगतात आणीबाणी आणि त्यानंतरचा जनता पक्ष. आणीबाणीत जे अत्याचार झाले त्याचे समर्थन कुणीही करू शकत नाही. भले त्यावेळी चांगल्या अनुशासनासाठी शिवसेनेते पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर जे काही घडले त्याचे समर्थन कुणीही केले नाही. मात्र, आणीबाणीनंतर, ज्यांनी आणीबाणी लादली होती, त्यानी आपल्या विरोधात प्रचार करायला किमान लोकांना वाव तरी दिला. मोठ-मोठ्या जनसभा झाल्य. अनेक जण देशासाठी मैदानात उतरले आणि त्यांना उतरू दिले हीही एक वेगळी लोकशाहीच म्हणायला हवी, असेही ठाकरे म्हणाले.  

आता जे चालले आहे, बोलायचेच नाही. बोलायला लागले की, तोंडच बंद करून टाकायचे. खरे तर, आणीबाणी आहे की नाही, हा आजचा विषय नाही. पण, जेव्हा एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला आपण त्याच्या शताब्दीनिमित्त अभिवादन करायला जमतो, तेव्हा त्यांनी केलेल्या कार्यचे स्मरण करायला हवे, असेही ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाMumbaiमुंबईBJPभाजपाShiv Senaशिवसेना