शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
4
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
5
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
6
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
7
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
9
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
10
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
11
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
12
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
13
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
14
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
15
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
16
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
17
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
18
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
19
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
20
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...

"ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत" उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 19:54 IST

"ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचार सरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे."

मुंबई - ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचार सरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तेथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मदी सरकारवर हल्ला चढवला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबुजी) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या 'जवाहर' या चरित्र ग्रंथाचे मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी, राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राजेंद्र दर्डा, विजय दर्डा तथा प्रल्हाद पै हे व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, बाबूजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तुरुंगवास भोगला. पुढे काय होणार? शाळेत कसे जाणार, कॉलेजमध्ये काय होणार? याचा नव्हे, तर देश माझा स्वतंत्र झाला पाहीजे, हा विचार होता. अशा असंख्य लोकांनी आपापल्या परीने त्याग केला, सोसलं, भोगलं म्हणून आपण आज सुखाने राहू शकतो. मात्र, आताच्या या राजकारणात माला सांगावसे वाटते की, ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचारसरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे. मग त्यावेळी बाबूजींनी जे केले, त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात आणायला हव्या. 

अगदी काँग्रेसच्या वाईट काळात इंदिरा गांधींसोबत उभे राहणे, ही काही गमतीची गोष्ट नव्हती संपूर्ण जग विरोधात होते. अनेक जण सांगतात आणीबाणी आणि त्यानंतरचा जनता पक्ष. आणीबाणीत जे अत्याचार झाले त्याचे समर्थन कुणीही करू शकत नाही. भले त्यावेळी चांगल्या अनुशासनासाठी शिवसेनेते पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर जे काही घडले त्याचे समर्थन कुणीही केले नाही. मात्र, आणीबाणीनंतर, ज्यांनी आणीबाणी लादली होती, त्यानी आपल्या विरोधात प्रचार करायला किमान लोकांना वाव तरी दिला. मोठ-मोठ्या जनसभा झाल्य. अनेक जण देशासाठी मैदानात उतरले आणि त्यांना उतरू दिले हीही एक वेगळी लोकशाहीच म्हणायला हवी, असेही ठाकरे म्हणाले.  

आता जे चालले आहे, बोलायचेच नाही. बोलायला लागले की, तोंडच बंद करून टाकायचे. खरे तर, आणीबाणी आहे की नाही, हा आजचा विषय नाही. पण, जेव्हा एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला आपण त्याच्या शताब्दीनिमित्त अभिवादन करायला जमतो, तेव्हा त्यांनी केलेल्या कार्यचे स्मरण करायला हवे, असेही ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाMumbaiमुंबईBJPभाजपाShiv Senaशिवसेना