शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

"ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत" उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 19:54 IST

"ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचार सरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे."

मुंबई - ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचार सरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तेथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मदी सरकारवर हल्ला चढवला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबुजी) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या 'जवाहर' या चरित्र ग्रंथाचे मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी, राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राजेंद्र दर्डा, विजय दर्डा तथा प्रल्हाद पै हे व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, बाबूजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तुरुंगवास भोगला. पुढे काय होणार? शाळेत कसे जाणार, कॉलेजमध्ये काय होणार? याचा नव्हे, तर देश माझा स्वतंत्र झाला पाहीजे, हा विचार होता. अशा असंख्य लोकांनी आपापल्या परीने त्याग केला, सोसलं, भोगलं म्हणून आपण आज सुखाने राहू शकतो. मात्र, आताच्या या राजकारणात माला सांगावसे वाटते की, ज्या विचार सरणीचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, अशी विचार सरणी आज देशावर राज्य करत आहे. ती विचारसरणी देशाला आपल्या कह्यात घेऊ इच्छित आहे. मग त्यावेळी बाबूजींनी जे केले, त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात आणायला हव्या. 

अगदी काँग्रेसच्या वाईट काळात इंदिरा गांधींसोबत उभे राहणे, ही काही गमतीची गोष्ट नव्हती संपूर्ण जग विरोधात होते. अनेक जण सांगतात आणीबाणी आणि त्यानंतरचा जनता पक्ष. आणीबाणीत जे अत्याचार झाले त्याचे समर्थन कुणीही करू शकत नाही. भले त्यावेळी चांगल्या अनुशासनासाठी शिवसेनेते पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर जे काही घडले त्याचे समर्थन कुणीही केले नाही. मात्र, आणीबाणीनंतर, ज्यांनी आणीबाणी लादली होती, त्यानी आपल्या विरोधात प्रचार करायला किमान लोकांना वाव तरी दिला. मोठ-मोठ्या जनसभा झाल्य. अनेक जण देशासाठी मैदानात उतरले आणि त्यांना उतरू दिले हीही एक वेगळी लोकशाहीच म्हणायला हवी, असेही ठाकरे म्हणाले.  

आता जे चालले आहे, बोलायचेच नाही. बोलायला लागले की, तोंडच बंद करून टाकायचे. खरे तर, आणीबाणी आहे की नाही, हा आजचा विषय नाही. पण, जेव्हा एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला आपण त्याच्या शताब्दीनिमित्त अभिवादन करायला जमतो, तेव्हा त्यांनी केलेल्या कार्यचे स्मरण करायला हवे, असेही ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाMumbaiमुंबईBJPभाजपाShiv Senaशिवसेना