शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

"आदित्य-तेजस काका काका म्हणत होते, पण घरातलाच माणूस उलटा फिरला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 15:49 IST

आता उद्धव ठाकरेंसोबत कुणी नाही, मग आता वेळ आलीय शिवसेनेला संपवा हे २०१४ चे वाक्य आहे असा दावा ठाकरेंनी सभेत केला.

धाराशिव -भाजपा, मिंदे, दुसरे ७० हजार कोटीवाले जे तिकडे गेलेत. निर्लज्जम सदासुखी...ही जी माणसं सोडून गेली त्यातल्या काहींना मी माझ्या लहानपणापासून बघत आलोय, काहींना त्यांच्या लहानपणापासून बघतोय. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना भरभरून दिले, आम्ही त्यांना भरभरून दिले. घरातील कुटुंबाप्रमाणे वागलो. आदित्य-तेजस त्यांना काका काका म्हणून बोलत होते. आम्हालाही तो धक्का होता. आपल्या घरातील माणूस एवढा उलटा फिरू शकतो आणखी मी काय देऊ असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिवसेना सोडणाऱ्यांवर घणाघात केला. 

धाराशिवच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या मनात मुख्यमंत्रिपद नव्हते. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की भाजपाने आपल्याला दगा दिला. पाठीत वार केला. होय, केलाच. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शाह यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला होता. त्यानंतर तो शब्द नाकारलेला आहे. त्यांनी आम्हाला दगा दिला. मी बाळासाहेबांना वचन दिले होते. मी पहिल्यांदा त्यांना माझे वडील म्हणून पाहिलेले आहे. पुत्र म्हणून त्यांना शेवटच्या काळात सांगितले होते, तुम्ही काळजी करू नका. एक ना एक दिवस आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. मी मुख्यमंत्री होईन असं वचन दिले नव्हते. त्यामुळे माझे वचन अजून अपूर्णच आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करायचाच आहे. माझे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो असं ठाकरेंनी म्हटलं. 

तसेच भाजपा वापरा आणि फेकून द्या असं त्यांच्यासोबत गेलेले म्हणतात. नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर केले नाही. मोदी-शाह हे नाव भाजपात आहेत हेदेखील आम्हाला माहिती नव्हते तेव्हापासून महाजन मुंडे यांना ओळखतो. ते आमच्या कुटुंबाचे भाग आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आम्ही तेव्हाही हिंदू होतो, आजही आहोत. २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली होती. कशासाठी? तरीदेखील हिंदुत्व म्हणून पुन्हा एकत्र आलो. आता बाळासाहेब ठाकरे राहिले नाहीत. ज्यांनी तुम्हाला वाचवलं, आता उद्धव ठाकरेंसोबत कुणी नाही, मग आता वेळ आलीय शिवसेनेला संपवा हे २०१४ चे वाक्य आहे. जे भाजपाच्याच एका नेत्याने मला सांगितले असा दावा उद्धव ठाकरेंनी सभेत केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे